शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

coronavirus:...असल्या राजकारणाची काय गरज? बस प्रकरणावरून काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा पक्षाला घरचा अहेर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:05 IST

उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजुरांना बससेवा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमनेसामने आले आहेत.

लखनौ - एकीकडे कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे देशभरात राजकारणालाही उत आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजुरांना बससेवा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमनेसामने आले आहेत. तसेच या प्रकरणावरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या बंडखोर आमदार अदिती सिंह यांनी आता या लढाईत उडी घेतली असून, संकटकाळामध्ये असे दुय्यम दर्जाचे राजकारण करणे योग्य नाही, असा घरचा अहेर त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. तसेच जर बस उपलब्ध होत्या तर त्यांचा वापर पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात त्यांचा वापर का करण्यात आला नाही, अशी विचारणा, अदिती सिंह यांनी केली आहे.

अदिती सिंह यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, संकटाच्या वेळी अशा दुय्यम दर्जाच्या राजकारणाची गरज काय आहे? काँग्रेसकडून ज्या बसची यादी पाठवण्यात आली आहे, त्यापैकी अर्ध्याहून अधिक बसची माहिती खोटी आहे. या बसपैकी २९७ बस ह्या भंगार आहेत. तर ९८ ऑटोरिक्षा आणि अॅम्ब्युलन्स सारखी वाहने आणि ६८ वाहनांची कागदपत्रेच उपलब्ध नाहीत. हा कसला क्रूर विनोद आहे. जर बस उपलब्ध होत्या तर त्यांच्या वापर राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रात का करण्यात आला नाही?

दरम्यान,  स्थलांतरित मजुरांना गावी पाठविण्यासाठी बसेस चालविण्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात राजकीय संघर्ष जुंपला आहे. या मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत. तथापि, उत्तर प्रदेश सरकार काँग्रेसला यासाठी परवानगी देण्यास कचरत आहे. या मुद्यांवरून काँग्रेस आणि उत्तर प्रदेश सरकारदरम्यान कोंडी कायम असताना प्रियांका गांधी यांचे खाजगी सचिव संदीप सिंह यांनी आज मंगळवारी उत्तर प्रदेशच्या गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांना पत्र पाठवून सर्व बसेस चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने भूमिका बदलत मंगळवारी रात्री पत्र पाठवून काँग्रेसला बसगाड्यांचे नंबर, चालक आदीची तपशीलवार माहिती देण्यास सांगितले. काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने एक हजार बसेस लखनौला पाठविण्यास सांगितले. प्रियांका गांधी यांनीही तातडीने सरकारला पत्र पाठवून कळविले की, एवढ्या कमी वेळेत बसेस लखनौला पोहोचू शकत नाहीत. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ