शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

coronavirus:...असल्या राजकारणाची काय गरज? बस प्रकरणावरून काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा पक्षाला घरचा अहेर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:05 IST

उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजुरांना बससेवा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमनेसामने आले आहेत.

लखनौ - एकीकडे कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे देशभरात राजकारणालाही उत आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजुरांना बससेवा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमनेसामने आले आहेत. तसेच या प्रकरणावरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या बंडखोर आमदार अदिती सिंह यांनी आता या लढाईत उडी घेतली असून, संकटकाळामध्ये असे दुय्यम दर्जाचे राजकारण करणे योग्य नाही, असा घरचा अहेर त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. तसेच जर बस उपलब्ध होत्या तर त्यांचा वापर पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात त्यांचा वापर का करण्यात आला नाही, अशी विचारणा, अदिती सिंह यांनी केली आहे.

अदिती सिंह यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, संकटाच्या वेळी अशा दुय्यम दर्जाच्या राजकारणाची गरज काय आहे? काँग्रेसकडून ज्या बसची यादी पाठवण्यात आली आहे, त्यापैकी अर्ध्याहून अधिक बसची माहिती खोटी आहे. या बसपैकी २९७ बस ह्या भंगार आहेत. तर ९८ ऑटोरिक्षा आणि अॅम्ब्युलन्स सारखी वाहने आणि ६८ वाहनांची कागदपत्रेच उपलब्ध नाहीत. हा कसला क्रूर विनोद आहे. जर बस उपलब्ध होत्या तर त्यांच्या वापर राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रात का करण्यात आला नाही?

दरम्यान,  स्थलांतरित मजुरांना गावी पाठविण्यासाठी बसेस चालविण्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात राजकीय संघर्ष जुंपला आहे. या मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत. तथापि, उत्तर प्रदेश सरकार काँग्रेसला यासाठी परवानगी देण्यास कचरत आहे. या मुद्यांवरून काँग्रेस आणि उत्तर प्रदेश सरकारदरम्यान कोंडी कायम असताना प्रियांका गांधी यांचे खाजगी सचिव संदीप सिंह यांनी आज मंगळवारी उत्तर प्रदेशच्या गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांना पत्र पाठवून सर्व बसेस चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने भूमिका बदलत मंगळवारी रात्री पत्र पाठवून काँग्रेसला बसगाड्यांचे नंबर, चालक आदीची तपशीलवार माहिती देण्यास सांगितले. काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने एक हजार बसेस लखनौला पाठविण्यास सांगितले. प्रियांका गांधी यांनीही तातडीने सरकारला पत्र पाठवून कळविले की, एवढ्या कमी वेळेत बसेस लखनौला पोहोचू शकत नाहीत. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ