शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Coronavirus: कोरोना मुक्तीनंतरही बारा आठवडे काळजीचे, ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 08:45 IST

Coronavirus in India: कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरही १२ आठवड्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ त्या आजाराचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरही १२ आठवड्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ त्या आजाराचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर तब्येतीची नीट काळजी घेण्याकडेही रुग्णांनी लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनातून बरे झाल्यानंतरही त्याची काही लक्षणे बराच काळ मागे उरतात. अनेकांना श्वास घेण्यात अडचणी येतात. काहींच्या फुप्फुसात दोष निर्माण होतो. बरे झाल्यानंतरही त्या व्यक्तींना अनेक आठवडे खोकला, सर्दीचा त्रास सहन करावा लागतो. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना सतत थकवा जाणवतो किंवा सांधेदुखी सुरू होते. कोरोनाचा संसर्ग जसा कमी होईल तसे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढत जाईल. त्या लोकांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे नवे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहील. गावांमध्ये कोनारोला रोखण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या दोन लाटांमध्ये लहान मुलांना फार झळ पोहोचली नव्हती. मुलांना कोरोना झाला तरी त्याची लक्षणे खूप कमी असतात. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा धोका आहे, असे सांगितले जात आहे. मात्र हा संसर्ग कमी की जास्त प्रमाणात होईल, हे आताच सांगता येणार नाही.नव्या कोरोना रुग्णांत घट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, ७ मे रोजी देशात एकाच दिवसात सर्वाधिक ४.१४ लाख नवे कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र त्यात नंतर घट झाली. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे २.२२ लाख नवे रुग्ण आढळले. गेल्या चाळीस दिवसांतील हा नीचांक आहे. दर दिवशी कोरोनाचे १०० रुग्ण आढळतात, अशा जिल्ह्यांची संख्या ४ मे रोजी ५३१ होती. ती आता ४३१ पर्यंत खाली घसरली आहे. 

बरे होणाऱ्यांची संख्या अधिकनव्या रुग्णांच्या संख्येत घट होण्याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ३ मे रोजी ८१.७ टक्के होते. गेल्या ११ दिवसात बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. २७ राज्यांत सध्या ही स्थिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य