शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Coronavirus : इराणमधून लष्कराच्या विशेष विमानाने १९५ भारतीयांना परत आणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 13:19 IST

भारतीय नागरिकांवर उपचारासाठी इराण सरकारने असमर्थता दर्शविली होती..

ठळक मुद्देजैसलमेर येथील केंद्रात दाखल : सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर ४८४ नागरिकांवर विलगीकरण कक्षात प्रथमोपचार सुरू

पुणे: इराणमधून लष्कराच्या विशेष विमानाने बुधवारी सायंकाळी १९५ भारतीयांना देशात परत आणले. त्यांच्यावर जैसलमेर येथील लष्करी स्वस्थता केंद्रातील विलगीकरण कक्षात प्रथमोपचार सुरू केले आहे. आतापर्यंत इराणमधून ४८४ भारतीयांना लष्कराने परत आणले. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. असे असले, तरी लष्कराची आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.इराण येथे मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक आहेत. इराणमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तेथील भारतीय नागरिकांवर उपचारासाठी इराण सरकारने असमर्थता दर्शविल्यानंतर भारत सरकारने लष्कर व हवाईदलाच्या मदतीने भारतीय आरोग्य पथक इराणला पाठवले होते. यासोबतच भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष मोहीमही राबविण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी तिसºया खेपेत जवळपास १९५ भारतीयांना सुरक्षित देशात आणले. परदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणीसाठी तसेच उपचारासाठी लष्करातर्फे  जैसलमेर येथे लष्करी स्वस्थता केंद्र उभारले आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व नागरिकांना येथे ठेवले आहे. संशयित रुग्णांसाठी विशेष विलगीकरण कक्ष तयार केले आहे. त्याठिकाणी कोरोनाच्या प्राथमिक चाचण्या तसेच नमुने घेऊन त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या आहेत. शुक्रवारी (दि.१३) २३६ नागरिकांना इराण येथून भारतात आणले होते. रविवारी (दि.१५) ५३ भारतीयांना भारतात परत आणले. बुधवारी (दि.१८) १९५ भारतीयांना भारतात परत आणले आहे. सर्व नागरिक लष्करी स्वस्थता केंद्रातील आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहे. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. सर्व नागरिकांच्या आरोग्य सुविधांबरोबरच त्याच्या खानपानाचीही व्यवस्था लष्कराकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेIranइराणcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारIndian Armyभारतीय जवान