शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

CoronaVirus: कोरोनाची दुसरी लाट मानवी प्रयत्नांनी रोखणं शक्य नव्हतं; अमित शाह यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 12:55 IST

CoronaVirus: देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे.

नवी दिल्ली: देशभरात गेल्या २४ तासांत ३१ हजार ४४३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या ११८ दिवसातील ही सर्वांत कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सध्या ४ लाख ३१ हजार ३१५ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४६ हजार ००७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०० लाख ६३ हजार ७२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. देशात एका दिवसाला ३ लाखांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या आता ५० हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. 

कोरोनाची दुसरी लाट मानवी प्रयत्नांनी रोखणं शक्य नव्हतं, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. देशात तिसरी लाट येण्याची शंका व्यक्त होत असतानाच अमित शाह यांनी गुजरातमधल्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे. 

इंडियन मेडिकल असोसियशनने (Indian Medical Association)दिलेल्या एका इशाऱ्यामुळे चिंता वाढणार आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे आणि ती लवकरच येईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी इतक्यात कोरोना निर्बंधातून सूट देऊ नये, अशा इशारा इंडियन मेडिकल असोसियशनने दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे आणि कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. असे केल्यानेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल, असं आयएमएने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जागतिक पुरावे आणि महामारीचा इतिहास पाहता तिसरी लाट नक्की येणार आहे, असा दावा केला आहे. 

कोरोनाची तिसरी लाट ४ जुलैलाच सुरू-

कोरोनाची दैनंदिन प्रकाशित होणारी आकडेवारी आणि पहिल्या दोन लाटांचे पॅटर्न यांचा तौलनिक अभ्यास केला असता, दुसरी लाट ४ जुलै रोजी सुरु झाली आहे, असं हैद्राबाद विद्यापीठातील प्रसिद्ध अभ्यासक डॉ. बिपीन श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जशी परिस्थिती होती, तशीची परिस्थिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात होती, असं डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहाBJPभाजपाIndiaभारत