शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

Coronavirus : कोरोनाची धास्ती; शाळा, कॉलेजसह थिएटर्स बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 6:07 PM

Coronavirus : गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील शाळा, कॉलेज आणि सर्व थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंदजागतिक आरोग्य संघटनेने जगात महारोगराई पसरल्याचे घोषित केले आहे केंद्र सरकारने 15 एप्रिलपर्यंत सगळे व्हिसा रद्द केले आहे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे भारतासह संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील शाळा, कॉलेज आणि सर्व थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन सर्व थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, ज्या शाळा आणि कॉलेजमध्ये परीक्षा सुरू नाहीत, त्या शाळा आणि कॉलेज सुद्धा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येणार आहेत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली सरकारच्या कार्यालयांमध्ये बायोमॅट्रिक अटेंडेंसला स्थगिती देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरचा फटका 100 हून अधिक देशांना बसल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने जगात महारोगराई पसरल्याचे घोषित केले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच, केंद्र सरकारने 15 एप्रिलपर्यंत सगळे व्हिसा रद्द केले आहे. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राजदूत, संयुक्त राष्ट्र, महत्त्वाच्या प्रकल्पांवरील अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.

जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यटकांचे व्हिसा 13 मार्चपासून (उद्या) रद्द होतील. 15 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही या कालावधीत प्रवेश दिला जाणार नाही. जगभरात कोरोनाचा झालेला फैलाव आणि दुबई, अमेरिकेसह काही देशांतून परतलेल्या भारतीयांमध्ये दिसून आलेली कोरोनाची लक्षणं या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना (ओएसआय कार्डधारक) देशात व्हिसामुक्त प्रवास करता येतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही 15 एप्रिलपर्यंत भारतात येता येणार नाही. 

टॅग्स :corona virusकोरोनाdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल