शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

Coronavirus: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ; फक्त ४ दिवसात आढळले ‘एवढे’ रुग्ण  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 8:39 AM

कोरोनाग्रस्त काही रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशातील २९ राज्यामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनाबाधित रुग्णांच्या २० टक्के रुग्ण तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाशी जोडले गेलेगेल्या ४ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराने वाढून सध्या २ हजारांवर पोहचली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येला तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला जबाबदार धरण्यात येत आहे

नवी दिल्ली – संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाग्रस्त काही रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशातील २९ राज्यामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. मागील काही दिवसात वाऱ्याच्या वेगाने कोरोना पसरत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ३ होती, १४ मार्च पर्यंत हा आकडा वाढून १०० वर पोहचला. २४ मार्च रोजी कोरोनाबाधितांची सख्या ५०० वर येऊन पोहचली. तर २९ मार्चनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार झाली तर गेल्या ४ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराने वाढून सध्या २ हजारांवर पोहचली आहे. कोरोना संक्रमणाचा अंदाज लावला तर अवघ्या ४ दिवसांत १ हजार रुग्ण आढळून आल्याने हा व्हायरस किती जलदगतीने भारतात पसरतोय हे दिसून येते.

भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येला तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला जबाबदार धरण्यात येत आहे. निजामुद्दीन मरकजचं प्रकरण समोर आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसली. मार्च महिन्यात मरकज येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात देशातील १९ राज्य आणि परदेशातील १६ देशातील जवळपास ८ ते ९ हजार लोक सहभागी झाल्याचा अंदाज आहे.

कार्यक्रमानंतर लॉकडाऊनपर्यंत मरकज येथे अडीच हजार लोक राहिले तर बाकीचे लोक आपापल्या राज्यात निघून गेले. यातील काही लोकांमध्ये कोरोना संक्रमण आढळलं. तपासणीनंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली. आता हे लोक कोणकोणत्या राज्यात गेले, कोणाच्या संपर्कात आलेत या सर्वाचा शोध घेणं मोठं आव्हानात्मक आहे. राज्यात युद्धस्तरावर या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेणं सुरु आहे. या लोकांशी संपर्कात आलेल्या आतापर्यंत ९ हजार लोकांना क्वारंटाईन केले आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या २० टक्के रुग्ण तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. ५०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. हा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. फक्त दिल्लीत कोरोना व्हायरसचे २९३ रुग्ण आढळून आलेत त्यातील १८२ रुग्ण मरकजशी जोडले गेले होते. राजधानी दिल्लीत मरकज येथे गेलेल्या दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तर देशात मरकजशी जोडलेल्या १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या