शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Coronavirus: शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी उठवला आवाज; लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 17:37 IST

देशभर राबविण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू झाला आणि 14 एप्रिल रोजी संपणार आहे. तरीही तो पुढे वाढवण्याचा मोदी सरकारने संकेत दिले आहेत. 

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकर्‍यांचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे. शेतकऱ्यांसाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतक-यांच्या हितासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकर्‍यांचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे. शेतीपासून बाजारापर्यंत माल पोहोचवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. शेतकऱ्यांसाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतक-यांच्या हितासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, लॉकडाऊन सुरक्षितरीत्या काढणं शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. रब्बी हंगामातील पिकं शेतात उभी राहिलेली असून, लॉकडाऊनपायी कापणीचे काम कठीण झाले आहे. यामुळे शेकडो शेतकर्‍यांची उपजीविका धोक्यात आली आहे. देशातील अन्नदाता शेतकरी आज या दुहेरी संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर राबविण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू झाला आणि 14 एप्रिल रोजी संपणार आहे. तरीही तो पुढे वाढवण्याचा मोदी सरकारने संकेत दिले आहेत. परराष्ट्र धोरणात घाबरून निर्णय घेणं हा देशवासीयांचा अपमान- कॉंग्रेसदुसरीकडे परराष्ट्र धोरणात घाबरून निर्णय घेणं हा देशवासियांचा अपमान असल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरिया औषधासंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर कॉंग्रेसने बुधवारी सरकारला फटकारले. पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील परराष्ट्र धोरण व पूर्वीच्या परंपरेतून विद्यमान सरकारने काही तरी शिकले पाहिजे. त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे सांगितले की, 'आम्ही जागतिक समुदायाला कुटुंब मानतो. आम्ही नेहमीच लोकांना मदत करत आलो आहोत. परंतु जर कोणी आम्हाला धमकी दिली तर ते स्वीकारले जाऊ शकत नाही. भारत कधीही कोणासमोर झुकला नाही. १९७१मध्ये बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामात ब्रिटन आणि अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. जेणेकरून इतर कुठलाही देश भारताच्या अंतर्गत विषय आणि आपल्या राष्ट्रीय हिताच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचं धाडस करणार नाही. सरकारने आपली ही परंपरा लक्षात ठेवली पाहिजे. कॉंग्रेस नेते म्हणाले, "परराष्ट्र धोरण हा एक राजकीय विषय नाही आणि यावर आम्ही आणि सर्व पक्ष सरकारबरोबर उभे आहोत, परंतु भीतीमुळे कोणताही निर्णय घेतला जाईल, तर तो देशातील १३० कोटी जनतेचा अनादर ठरेल."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी