शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

Coronavirus: शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी उठवला आवाज; लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 17:37 IST

देशभर राबविण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू झाला आणि 14 एप्रिल रोजी संपणार आहे. तरीही तो पुढे वाढवण्याचा मोदी सरकारने संकेत दिले आहेत. 

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकर्‍यांचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे. शेतकऱ्यांसाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतक-यांच्या हितासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकर्‍यांचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे. शेतीपासून बाजारापर्यंत माल पोहोचवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. शेतकऱ्यांसाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतक-यांच्या हितासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, लॉकडाऊन सुरक्षितरीत्या काढणं शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. रब्बी हंगामातील पिकं शेतात उभी राहिलेली असून, लॉकडाऊनपायी कापणीचे काम कठीण झाले आहे. यामुळे शेकडो शेतकर्‍यांची उपजीविका धोक्यात आली आहे. देशातील अन्नदाता शेतकरी आज या दुहेरी संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर राबविण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू झाला आणि 14 एप्रिल रोजी संपणार आहे. तरीही तो पुढे वाढवण्याचा मोदी सरकारने संकेत दिले आहेत. परराष्ट्र धोरणात घाबरून निर्णय घेणं हा देशवासीयांचा अपमान- कॉंग्रेसदुसरीकडे परराष्ट्र धोरणात घाबरून निर्णय घेणं हा देशवासियांचा अपमान असल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरिया औषधासंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर कॉंग्रेसने बुधवारी सरकारला फटकारले. पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील परराष्ट्र धोरण व पूर्वीच्या परंपरेतून विद्यमान सरकारने काही तरी शिकले पाहिजे. त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे सांगितले की, 'आम्ही जागतिक समुदायाला कुटुंब मानतो. आम्ही नेहमीच लोकांना मदत करत आलो आहोत. परंतु जर कोणी आम्हाला धमकी दिली तर ते स्वीकारले जाऊ शकत नाही. भारत कधीही कोणासमोर झुकला नाही. १९७१मध्ये बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामात ब्रिटन आणि अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. जेणेकरून इतर कुठलाही देश भारताच्या अंतर्गत विषय आणि आपल्या राष्ट्रीय हिताच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचं धाडस करणार नाही. सरकारने आपली ही परंपरा लक्षात ठेवली पाहिजे. कॉंग्रेस नेते म्हणाले, "परराष्ट्र धोरण हा एक राजकीय विषय नाही आणि यावर आम्ही आणि सर्व पक्ष सरकारबरोबर उभे आहोत, परंतु भीतीमुळे कोणताही निर्णय घेतला जाईल, तर तो देशातील १३० कोटी जनतेचा अनादर ठरेल."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी