शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus: ...हा तर औरंगाबाद आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान; ओवेसी पंतप्रधान मोदींवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 10:02 AM

Coronavirus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीवरुन टीकास्त्र

हैदराबाद: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदी देशातील सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र या चर्चेसाठी मला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. हा हैदराबाद आणि औरंगाबादचा अपमान असल्याचं ओवेसींनी म्हटलंय.पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनला (एआयएमआयएम) आमंत्रित करण्यात आलेलं नाही. हा औरंगाबाद आणि हैदराबादकरांचा अपमान असल्याची टीका ओवेसींनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 'औरंगाबाद आणि हैदराबादकरांनी एमआयएमला पसंती दिली म्हणजे ते माणूस म्हणून कमी महत्त्वाचे आहेत का? तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय, यामागचं नेमकं कारण काय? आमच्या लोकांच्या व्यथा, मग त्या आर्थिक दृष्टीकोनातून असोत वा मानवतावादी दृष्टीकोनातून, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे,' असं ओवेसींनी ट्विटमध्ये म्हटलं असून त्यात पंतप्रधान कार्यालयाला टॅगदेखील केलंय. हैदराबाद आणि औरंगाबादच्या जनतेनं अनुक्रमे माझी आणि इम्तियाज जलील यांची निवड केली. आम्ही त्यांचे प्रश्न, समस्या मांडू यासाठी त्यांनी आम्हाला निवडून दिलं. मात्र आता आम्हाला त्यांच्या समस्याच मांडता येत नाहीत. हैदराबादमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण आढळून आले आहेत. या संकटाचा सामना कसा सामना कसा करायचा, ज्या भागांमध्ये आपण कमी पडतोय, तिथे काय करायचं, याबद्दलच्या काही संकल्पना मला मांडायच्या होत्या, असंदेखील ओवेसींनी पुढे म्हटलं. असदुद्दीन ओवेसींनी त्यांच्या ट्विटसोबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कार्यालयाचं पत्र जोडलंय. पंतप्रधान राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याचा उल्लेख यात आहे. लोकसभा आणि राज्यसभेत मिळून पाचपेक्षा अधिक सदस्य असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मोदी संवाद साधतील, असं यात नमूद करण्यात आलंय. एमआयएमचे लोकसभेत दोन सदस्य असून राज्यसभेत एकही प्रतिनिधी नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद