शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

CoronaVirus: बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:59 AM

CoronaVirus: बिहारमधील दरभंगा येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर PM केअर्स फंडातून आयसीयू सेटअपसह २५ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते.

ठळक मुद्देबिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखातदरभंगा येथील बाब उघडकीसव्हेंटिलेटर्स न वापरण्याचे कारण काय?

दरभंगा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे वाढती मृत्यूंची संख्या चिंताजनक ठरत चालली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. केंद्राकडून राज्यांना शक्य ती मदत केली जात असतानाही बिहारमधील दरभंगा येथून धक्कादायक माहिती समोर येत आहे. PM केअर्समधून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स धूळखात पडले असून, गेल्या ९ महिन्यांत त्याचा एकदाही वापर केला गेला नसल्याचे सांगितले जात आहे. (coronavirus pm cares ventilators not used for last 9 months in darbhanga bihar)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. मात्र, बिहारमधील दरभंगा येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर PM केअर्स फंडातून आयसीयू सेटअपसह २५ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. मात्र, हे सर्व व्हेंटिलेटर्स धूळखात पडले असून, गेल्या ९ महिन्यांपासून एकदाही वापरले नसल्याची माहिती मिळाली आहे. 

बिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!; हायकोर्टही हैराण 

व्हेंटिलेटर्स न वापरण्याचे कारण काय?

PM केअर्समधून व्हेंटिलेटर्स आले असतानाही त्याचा वापर का गेला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर डीएमसीएचचे अधीक्षक डॉ. मणि भूषण यांनी प्रतिक्रिया दिली. आयसीयू सेटअपसह व्हेंटिलेटर्स मिळाले, ही बाब सत्य आहे. या व्हेंटिलेटर्सना वापरासाठी तयार करण्यात येत होते. मात्र, ड्राय-रन प्रक्रिया यशस्वीरित्या सुरू होत नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स वापरले नाहीत, असे भूषण म्हणाले. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत. ड्राय-रन प्रक्रियेची चाचणी पुन्हा करण्यात येत असून, लवकरच हे व्हेंटिलेटर्स सुरू होऊन वापरात येतील, असे विश्वास भूषण यांनी व्यक्त केला आहे. 

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

रुग्णांसाठी धोकादायक ठरले असते

ड्राय-रन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू झाली नाही, तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी ड्राय-रन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू झाल्याशिवाय व्हेंटिलेटर्स न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही भूषण यांनी सांगितले. 

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १८ कोटी ५८ लाख ०९ हजार ३०२ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारState Governmentराज्य सरकार