CoronaVirus: ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 02:36 PM2021-05-10T14:36:36+5:302021-05-10T14:40:01+5:30

CoronaVirus: अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई महापालिकेची पाठ थोपटली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाने मुंबईतील कोरोनाच्या व्यवस्थापनाची दखल घेत कौतुक केले आहे.

coronavirus niti aayog amitabh kant says inspirational mumbai model of corona management | CoronaVirus: ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक

CoronaVirus: ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक

Next
ठळक मुद्दे‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायीनीती आयोगाकडूनही दखलमहापालिकेचे केले कौतुक

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या घटताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई महापालिकेची पाठ थोपटली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाने मुंबईतील कोरोनाच्या व्यवस्थापनाची दखल घेत कौतुक केले आहे. (coronavirus niti aayog amitabh kant says inspirational mumbai model of corona management)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतील परिस्थिती बिकट झाली होती. मात्र,  महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. याची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि टीमचे कौतुक केले आहे.

“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी

केंद्रीय पद्धतीने बेडचे वाटप करणे, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणे, मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचे अभिनंदन, असे ट्विट अमिताभ कांत यांनी केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने केले होते कौतुक

एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कोरोना व्यवस्थापन मॉडेलचा दाखला दिला होता. न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोरोना व्यवस्थापनासंदर्भात मुंबई महापालिकेने तयार केलेलं मॉडेल देश आणि राज्यस्तरावर शक्य आहे का, अशी विचारणा केली होती.

“सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?”

दरम्यान, मुंबई, ठाण्यासह अनेक मोठ्या शहरांत लक्षणीय रुग्णघट होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात रविवारी करोनाचे ४८,४०१ रुग्ण आढळले, तर ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या सोमवारी राज्यात ४८,६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत रविवारी २,४०३ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला.
 

Web Title: coronavirus niti aayog amitabh kant says inspirational mumbai model of corona management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.