शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

CoronaVirus News : लॉकडाऊनने ७८ हजार मृत्यू रोखले; सक्षम गटाचे डॉ. व्ही. के. पॉल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 4:30 AM

डॉ. व्ही. के. पॉल शुक्रवारी येथे म्हणाले की, ‘‘देशात आज पाच राज्यांत कोविड-१९ चे ८० टक्के आणि दहा राज्यांत ९५ टक्के रुग्ण आहेत.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशात २० लाख कोरोना रुग्ण होणे आणि ७८ हजार मृत्यू रोखता आले, असे नीती आयोगाचे सदस्य आणि कोविड-१९ वरील सक्षम गटाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले. देशात कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) चाचण्यांची संख्या वाढली तशी रोज पाच हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे असे की, योग्यवेळी लॉकडाऊन लागू केले नसते तर आज देशात १४ ते २९ लाख रुग्णअसते.डॉ. व्ही. के. पॉल शुक्रवारी येथे म्हणाले की, ‘‘देशात आज पाच राज्यांत कोविड-१९ चे ८० टक्के आणि दहा राज्यांत ९५ टक्के रुग्ण आहेत. देशात स्थिती नियंत्रित करण्यात मदत मिळत आहे ही चांगली बाब आहे आणि कोरोना रुग्ण दोनपट होण्याचा दर आता १३.३ वर आला तर रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्के झाला आहे.’’डॉ. पॉल म्हणाले की, ‘‘अनेक मॉडेलमधून हे समोर येत होते की, देशात कोविड-१९ मुळे ३७ ते ७८ हजार लोकांचा मृत्यू होऊ शकला असता व योग्यवेळी लॉकडाऊन लागू केला नसता तर १४ ते २९ लाख रुग्ण असते.लॉकडाऊन जाहीर केला आणि कोट्यवधी लोकांनी घरातच राहून लॉकडाऊनची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. मास्क वापरला, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे जगात इतर देशांत कोविड-१९ चा फैलाव झाला तसा आपल्या देशात झाला नाही.’’५ राज्यात ८0% रुग्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली आणि तमिळनाडू या पाच राज्यांत जवळपास ८० टक्के कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर दहा राज्यांत (महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, तमिळनाडू,राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश) ९५ टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखता आले, असेही डॉ. पॉल म्हणाले.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘‘देशात कोविड-१९ चा मृत्यूदर ३.१३ वरून ३.०२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांत ३२३४ रुग्ण बरे झाले तर ४८५३४ रुग्ण बरे झाले आहेत.’’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या