शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: रुग्ण वाढू लागल्याने सामान्यांना धडकी; रविवारी १४२६४ नवे रुग्ण, मृत्यूदरात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 06:56 IST

उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून त्यांचे एकूण प्रमाण १.३२ टक्के आहे. मृत्यूदराचे प्रमाण मात्र कमी होऊन तो १.४२ टक्के झाले  आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग चौथ्या दिवशीही वाढ झाली असून रविवारी १४२६४ नवे रुग्ण आढळले व ९० जण मरण पावले. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून त्यांचे एकूण प्रमाण १.३२ टक्के आहे. मृत्यूदराचे प्रमाण मात्र कमी होऊन तो १.४२ टक्के झाले  आहे.

जगभरात ११ कोटी १६ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ८ कोटी ६८ लाख जण बरे झाले व २४ लाख ७२ हजार जणांचा बळी गेला. जगात २ कोटी २३ लाख कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. अमेरिकेत २ कोटी ८७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी ८८ लाख जण बरे झाले.

महाराष्ट्र, केरळमध्ये ७४ टक्के रुग्ण

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमध्ये ७४ टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळमधील आहेत. मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर येथेही दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. 

काेराेना, वंशवाद आणि असमानतेमुळे  विद्यार्थ्यांच्या मानसिक आराेग्यावर परिणाम

वाॅशिंग्टन- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तणाव, चिंता आणि उदासीनता वाढत असून, त्याचा परिणाम शिक्षणावर हाेत असल्याचे आढळून आले आहे. बाेस्टन विद्यापीठाने यासंदर्भात केलेल्या एका संशाेधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामागे राजकीय अस्थिरता, नियाेजनबद्ध वंशवाद, असमानता आणि काेराेना कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठाने सुमारे ३३ हजार विद्यार्थ्यांवर संशाेधन केले. विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि उदासीनता वाढत असल्याचे संशाेधकांना दिसून आले. मानसिक आराेग्यामुळे शैक्षणिक कामगिरीवर नकारात्मक परिणाम झाल्याचे ८३ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. तर दाेन तृतीयांश विद्यार्थ्यांमध्ये एकटेपणाची लक्षणे दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत