शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

CoronaVirus News: भारतातही होता कोरोनाचा नवा विषाणू, पण ठरला अल्पजीवी; आणखी विषाणूंची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 1:03 AM

‘आयजीआयबी’ च्या संचालकांची माहिती; आणखी विषाणूंची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूमध्ये होणाऱ्या परिवर्तनावर भारतीय शास्त्रज्ञ बारीक लक्ष ठेवून आहेत. कोरोनाच्या मूळ विषाणूतून काही नवे विषाणू उत्पन्न झाले. त्यापैकी एका विषाणूकडे मोठी संसर्गक्षमता होती, पण तो कालांतराने मृत झाला, असे इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी)चे संचालक अनुराग अग्रवाल यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, भारतामध्येही कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. आपल्या देशातही कोरोनाच्या आणखी नव्या विषाणूंची उत्पत्ती झाल्यास आश्चर्य वाटू नये.  इंग्लंडमध्ये कोरोनाच्या आढळून आलेल्या नव्या विषाणूमुळे जगभर घबराट निर्माण झाली आहे. या नव्या विषाणूचे रुग्ण फ्रान्ससहित इतर देशांतही आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत केलेले निरीक्षण महत्त्वाचे आहे.

अनुराग अग्रवाल म्हणाले की, मार्च ते मे महिन्यादरम्यान देशामध्ये कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला होता. दक्षिण आशियामध्ये कोरोना विषाणूत जनुकीय परिवर्तन होऊन ए ४ हा नवा विषाणू जन्माला आला. त्याच्याकडे मोठी संसर्गशक्ती होती. या नव्या विषाणूचा शोध दिल्ली, कर्नाटक, हैदराबादमधील रुग्णांच्या कोरोना चाचण्यांतून लागला. मात्र हा विषाणू जूनमध्ये मृत झाला. त्यामुळे या नव्या विषाणूबद्दल भारतात काहीही चर्चा झाली नाही तसेच घबराट निर्माण होण्याचाही प्रश्न नव्हता.

केरळ राज्याची मोलाची कामगिरी

एखाद्या कोरोना विषाणूचा मूळ विषाणू शोधून काढण्यासाठी जीन सिक्वेन्सिंगचे तंत्र वापरण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम केरळने ठेवला. त्या दिशेनेच नंतर काम झाल्यामुळेच देशात कोरोना विषाणूच्या परिवर्तनावर लक्ष ठेवणे व या आजारावर योग्य ते उपचार करणे अधिक सुलभ झाले, असेही आयजीआयबी संस्थेचे संचालक अनुराग अग्रवाल यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत