शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

CoronaVirus News : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४०%; मृत्युदर लाखामागे ०.२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 6:10 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : भारतात लाखापेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७.१ टक्के होते.

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : सलग चौथ्या लॉकडाऊनचा अत्यंत चांगला परिणाम दिसत असून, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता जवळपास ४० टक्क्यांवर पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत आरोग्य यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

भारतात लाखापेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७.१ टक्के होते. चौथ्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण तब्बल पाचपट करण्यात भारताला यश आले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ११.४२ टक्क्यांवरून तिसºया टप्प्यात दुपटीपेक्षा जास्त २६.५९ टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते.जगातील १५ देशांची एकत्रित लोकसंख्या भारताइतकी असून, तिथे ३६ लाख ४५ हजार रुग्ण आहेत. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने मात्र वेळीच उपाययोजना करून कोरोना प्रसार मर्यादित करण्यात यश मिळवले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असे वाढवलेलॉकडाऊनमध्ये अर्थव्यवहारावर निर्बंध आणताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांची पूर्तता देशात करण्यात आली. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी तीन श्रेणीत रुग्णालयांची विभागणी करण्यात आली. रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत असताना रुग्णांना होम क्वारंटाईन, दहा दिवसांनी घरी जाण्याची मुभाही दिली. जीवनशैलीतील बदलांमुळेही प्रतिकारशक्ती वाढली. उपचार सुरू असलेल्या ६१ हजार १४९ पैकी २.९४ टक्के रुग्णांना आॅक्सिजनपुरवठा केला जात आहे, तर ३ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, ६.४५ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपताना हे प्रमाण सरासरी ७० टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत २५ लाख ३६ हजार १५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. बुधवारी दुपारपर्यंत १ लाख ७ हजार ६०४ नमुने तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे वरिष्ठ संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.रुग्णसंख्येत दहा देशांच्या यादीत असूनही भारतात मृत्यूदर सर्वांत कमी आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक २७.७ टक्के रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत झाला. एक लाखामागे तेथे ५९ जणांचा मृत्यू झाला. भारतात हे प्रमाण एक लाख रुग्णांमागे ०.२ टक्का आहे. लोकसंख्येच्या बाबतीत तुल्यबळ असलेल्या चीनच्या दाव्यानुसार हे प्रमाण ०.३ टक्का आहे. अमेरिकेत दर लाखामागे ४५२, तर स्पेनमध्ये ४९६ जणांना कोरोना होतो. इटलीमध्ये ३७४, ब्रिटनमध्ये ३७१, जर्मनीमध्ये २११, फ्रान्समध्ये २१०, रशियात २०८, तुर्कीमध्ये १८३, इराणमध्ये १५०, ब्राझीलमध्ये ११५ संक्रमित आहेत. जगात हीच सरासरी ६२ आहे, तर भारतात एक लाख लोकांमागे ७.९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.0.3% आयसीयूतदेशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या61149 सध्या बाधित6147 रुग्ण10%हा आकडा आहे.43070ठणठणीत बरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत