शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CoronaVirus News: १० दिवसांत वाढले ५० हजार रुग्ण साथीचा विळखा आणखी घट्ट; देशात सर्वाधिक बळी गेले महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 23:35 IST

केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, देशातील कोरोना बळींची संख्या चार हजारांपेक्षा अधिक झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात माजविलेला हाहाकार कमी होण्याची चिन्हे नसून, तिथे आता या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५५ हजारांवर पोहोचली आहे. सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत ६ हजारांहून अधिक जणांची भर पडली होती. गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाहून दीड लाखावर गेली हीदेखील चिंताजनक बाब आहे.

यासंदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, देशातील कोरोना बळींची संख्या चार हजारांपेक्षा अधिक झाली आहे. सोमवारी १४६ जणांचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६०, गुजरातमधील ३०, दिल्लीतील १५, मध्यप्रदेशमधील १०, तामिळनाडूतील सात, पश्चिम बंगालमधील सहा, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील प्रत्येकी चार, तेलंगणामधील ३, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी दोन, केरळमधील एका रुग्णाचा समावेश होता.

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. या साथीच्या फैलावाचा वेग फेब्रुवारी महिन्यात काहीसा कमी झाला होता. गेल्या २७ दिवसांत कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले असून, त्यानंतर गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो.

लॉकडाऊनची मुदत वाढविणार असल्याची चर्चा

31 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आहे. या कालावधीतही देशातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोच आहे. ईशान्य भारतातदेखील कोरोना साथीने पुन्हा हातपाय पसरले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार लॉकडाऊनच्या मुदतीत आणखी वाढ करण्याची शक्यता असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. त्याचे पडसाद समाजमाध्यमांतही उमटत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूIndiaभारत