शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

Coronavirus: महाराष्ट्रासह देशात कहर करणाऱ्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला; 1000 पटींनी जास्त धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 11:48 IST

Coronavirus New Mutant N440K was infected Maharashtra, Karnataka: देशात पहिल्या लाटेचा एवढा प्रभाव जाणवलेला नसताना अचानक एवढी मोठी लाट कशी आली, याचे उत्तर हैदराबादच्या वैज्ञानिकांनी शोधले आहे.

हैदराबाद : देशात कोरोनाची दुसरी लाट हाताबाहेर जात असल्याचे पाहून सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊनचा (Lockdown) विचार करावा, अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारांना दिल्या आहेत. देशात पहिल्या लाटेचा (Corona Virus) एवढा प्रभाव जाणवलेला नसताना अचानक एवढी मोठी लाट कशी आली, याचे उत्तर हैदराबादच्या वैज्ञानिकांनी शोधले आहे. त्यांनी कोरोनाच्या जीवघेणा व्हायरस म्यूटेंटचा (Coronavirus New Mutant) शोध लावला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस अन्य स्ट्रेनच्या तुलनेत 10 पटींनी अधिक संक्रमण करणारा आहे. या म्युटेंटमुळेच देशातील काही भागात कोरोनाने हाहाकार माजविला असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. (Coronavirus New Mutant N440K was infected Maharashtra, Karnataka and two other state.)

CoronaVirus: येत्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी होणार? महाराष्ट्र, दिल्लीचे नंबर देत आहेत संकेत

देशभरात जो कोरोनाचा व्हायरस पसरला आहे, तो अन्य स्ट्रेनपेक्षा 10 ते 1000 पटींनी अधिक धोकादायक आहे. या म्युटेंटला 'N440K' नाव देण्यात आले आहे. या स्ट्रेनमुळेच देशात कोरोना हाताबाहेर गेला आहे. हा नवा व्हायरस आंध्रप्रदेशच्या करनूल शहरात पहिल्यांदा सापडला आहे. आता हा म्य़ुटेंट आंध, तेलंगानासह देशाच्या अन्य राज्यांमध्ये पसरला आहे. कोरोनाचे जेवढे रुग्ण सापडत आहेत, त्यापैकी एक तृतियांश रुग्ण हे याच व्हेरिअंटमुळे येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. तसेच हा व्हायरस फैलावत आहे. 

Coronavirus News: कोरोना लढ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं भारताला केली लाख मोलाची मदत!

गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील 50 टक्के कोरोना रुग्ण हे चार राज्यांमध्ये सापडले आहेत. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगाना आमि छत्तीसगड यांचा समावेश आहे. या चार राज्यांमध्ये कोरोनाचा हा नवा वेगवान स्ट्रेव पसरल्याचे संकेत देत आहे. हे संशोधन हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) आणि गाझियाबादची अॅकॅडमी फॉम साइंटिफिक अँड इनोव्हेशन सेंटरच्या वैज्ञानिकांनी केले आहे.

विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की

लॉकडाऊनचा विचार करा....

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. दररोज जवळपास ४ लाख नवे कोरोनाबाधित सापडत आहे. अनेक राज्यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. परंतु अद्यापही कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच आहे. यामुळे आता आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. अशा परिस्थिती कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करावा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिला आहे. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांना सामूहिक कार्यक्रम आणि सुपर स्प्रे़डर कार्यक्रमांवर बंदी घालण्यासाठी रोख लावण्यावर विचार करण्यास सांगू असंही सर्वोच्च न्यायालयानं रविवारी पार  पडलेल्या सुनावणीदरम्यान म्हटलं. लोकांच्या हितासाठी दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लावण्यावर विचार करू शकतात असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस