शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारचा ‘बिग प्लॅन’; तीन टप्प्यांची आखली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 15:46 IST

केंद्र सरकारचा हा प्लॅन केंद्र आणि राज्य यांच्यातील बैठकीनंतर समोर आला आहे.

ठळक मुद्देकोरोनाशी लढण्यासाठी मोदी सरकार आखतंय रणनीती तीन टप्प्यात कोरोनाविरुद्ध देणार लढा २०२४ पर्यंत सुरु राहणार कोरोनाविरोधात लढाई

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न करत आहे. आता मोदी सरकारने कोरोना महामारीशी लढण्यासाठी तीन टप्प्यातील रणनीती आखत आहे. केंद्राने कोविड १९ विरुद्ध लढाईत राज्यांसाठी पॅकेज जारी केले आहे.

राज्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजमध्ये इमरजेन्सी रिस्पॉन्स अँन्ड हेल्थ सिस्टिम प्रिपेअरनेस पॅकेज असं नाव दिलं आहे. या पॅकेजसाठी पूर्णत: १०० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे. कोरोनाविरुद्धची लढाई मोठ्या काळापर्यंत सुरु राहणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या गेलेल्या पत्राप्रमाणे हा प्रकल्प तीन टप्प्यात असणार आहे.

पहिला टप्पा जानेवारी २०२० ते जून २०२०, दुसरा टप्पा जुलै २०२० ते मार्च २०२१, तिसरा टप्पा एप्रिल २०२१ ते २०२४ अशाप्रकारे तीन टप्पे असणार आहे. पहिल्या टप्प्यात कोविड १९च्या उपचारासाठी हॉस्पिटल विकसित करणे, आयसोलेशन ब्लॉक बनवणे, व्हेंटिलेटर सुविधा असणारे आयसीयू बनवणे, पीपीई(पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) एन ९५ मास्क, व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध करणे. तसेच तपासणी केंद्र वाढवणे, त्याचसोबत निधीचा वापर महामारीविरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी केला जाईल. निधीचा एक हिस्सा रुग्णालय, सरकारी कार्यालये, जनसुविधा, रुग्णवाहिका यांना संक्रमित होण्यापासून वाचवणे यासाठी खर्च केला जाईल.

केंद्र सरकारचा हा प्लॅन केंद्र आणि राज्य यांच्यातील बैठकीनंतर समोर आला आहे. राज्य सरकारकडून कोविड १९ च्या विरोधात लढण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी वारंवार केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत पंतप्रधानांसमोरही हा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात काय काय असणार याबाबत खुलासा होणं बाकी आहे. पहिल्या टप्प्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन यामध्ये बदल करुन तसं नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी