शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Coronavirus: केंद्राप्रमाणेच मार्गदर्शक तत्त्वे हवीत, मोदी सरकारची महाराष्ट्राला सूचना; सर्वत्र सारखेच नियम आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 8:53 AM

Coronavirus: आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत केंद्राने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने आपल्या नियमांत बदल करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. देशात सर्वच ठिकाणी सारखेच कोरोना प्रतिबंधक नियम असणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत केंद्राने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने आपल्या नियमांत बदल करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. देशात सर्वच ठिकाणी सारखेच कोरोना प्रतिबंधक नियम असणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांतील चार मुद्द्यांबाबत केंद्राने आपल्या पत्रात भर दिला आहे. (१) कोणत्याही देशातून आलेला प्रवासी असो, त्याची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी. (२) ज्यांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी त्यांना सक्तीच्या १४ दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यासाठी मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांचीही आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी, तिचा निष्कर्ष निगेटिव्ह आला तरच या प्रवाशांना पुढील प्रवासाची परवानगी द्यावी; त्याशिवाय इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची प्रवास सुरू करण्याच्या ४८ तास आधी आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी. तिचा निष्कर्ष निगेटिव्ह असणे आवश्यक आहे; या मुद्द्यावरही केंद्र सरकारच्या पत्रात भर देण्यात आला आहे.

समान धोरणाची दिली ग्वाहीकेंद्राने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच भविष्यातील उपाययोजनांच्या प्रमाणेच आमचे धोरण असेल, अशी ग्वाही महाराष्ट्र सरकारने  दिली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्यानेही कडक पावले उचलण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस