शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

coronavirus: स्थलांतरितांमुळे केरळमध्ये कोरोना फैलावण्याचा धोका, रुग्णांपैकी ७० टक्के बाहेरून आलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 05:40 IST

कोची : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आलेल्या केरळपुढे आता एक वेगळेच आव्हान उभे ठाकणार आहे. अनेक ...

कोची : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आलेल्या केरळपुढे आता एक वेगळेच आव्हान उभे ठाकणार आहे. अनेक देशांतूून तसेच विविध राज्यांतून केरळचे स्थलांतरित कामगार मोठ्या संख्येने परतत असून, त्यांच्यामुळे कोरोनाची लागण पुन्हा मोठ्या प्रमाणावर होणार नाही यासाठी राज्य सरकारला अत्यंत दक्ष राहावे लागणार आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, राज्यामध्ये असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे स्थलांतरित कामगार आहेत. त्यांच्यामुळे केरळमधील इतर लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. सध्या विविध राज्यांतून वाहनांनी ३३,११६ स्थलांतरित कामगार केरळच्या सीमेपर्यंत आले आहेत. इतर देशांतून हवाईमार्गे १,४०६, तर सागरीमार्गाने ८३३ जण राज्यामध्ये परततील. यात आणखी मोठी भर काही दिवसांत पडणार आहे.केरळमधील वैद्यकीय व्यवस्थेची अनेक जण वाखाणणी करतात. विदेश तसेच विविध राज्यांतून केरळमध्ये आगामी काळात सुमारे ४ लाख २० हजार लोक पुन्हा परतण्याची शक्यता आहे. त्यात विविध राज्यांतून केरळला परतणाऱ्या दीड लाख स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे.इतक्या सर्व लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देतानाच कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईनची चोख व्यवस्था राज्याच्या वैद्यकीय यंत्रणेला उभारावी लागेल. तीच तर खरी कसोटी आहे.प्रवाशांची अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट करून मगच त्यांना विमानात बसविण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी विमान कंपन्यांना द्यावा, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केली आहे. आंतरराज्य प्रवासावरही काही निर्बंध असावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना नुकतेच एका बैठकीतसांगितले.मार्गदर्शक तत्त्वांत फरकक्वारंटाईनसंदर्भात केरळ राज्य सरकार व केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत फरक आहे. त्यामुळे त्याबाबत केरळ सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.मजुरांमध्ये संसर्गमध्य-पूर्वेतील देशांत बांधकाम मजुरांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तिथे अशा किती लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मध्य-पूर्व देशांमध्ये कोरोनामुळे २० केरळी लोक आतापर्यंत मरण पावल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत