शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: स्थलांतरितांमुळे केरळमध्ये कोरोना फैलावण्याचा धोका, रुग्णांपैकी ७० टक्के बाहेरून आलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 05:40 IST

कोची : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आलेल्या केरळपुढे आता एक वेगळेच आव्हान उभे ठाकणार आहे. अनेक ...

कोची : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आलेल्या केरळपुढे आता एक वेगळेच आव्हान उभे ठाकणार आहे. अनेक देशांतूून तसेच विविध राज्यांतून केरळचे स्थलांतरित कामगार मोठ्या संख्येने परतत असून, त्यांच्यामुळे कोरोनाची लागण पुन्हा मोठ्या प्रमाणावर होणार नाही यासाठी राज्य सरकारला अत्यंत दक्ष राहावे लागणार आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, राज्यामध्ये असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे स्थलांतरित कामगार आहेत. त्यांच्यामुळे केरळमधील इतर लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. सध्या विविध राज्यांतून वाहनांनी ३३,११६ स्थलांतरित कामगार केरळच्या सीमेपर्यंत आले आहेत. इतर देशांतून हवाईमार्गे १,४०६, तर सागरीमार्गाने ८३३ जण राज्यामध्ये परततील. यात आणखी मोठी भर काही दिवसांत पडणार आहे.केरळमधील वैद्यकीय व्यवस्थेची अनेक जण वाखाणणी करतात. विदेश तसेच विविध राज्यांतून केरळमध्ये आगामी काळात सुमारे ४ लाख २० हजार लोक पुन्हा परतण्याची शक्यता आहे. त्यात विविध राज्यांतून केरळला परतणाऱ्या दीड लाख स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे.इतक्या सर्व लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देतानाच कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईनची चोख व्यवस्था राज्याच्या वैद्यकीय यंत्रणेला उभारावी लागेल. तीच तर खरी कसोटी आहे.प्रवाशांची अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट करून मगच त्यांना विमानात बसविण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी विमान कंपन्यांना द्यावा, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केली आहे. आंतरराज्य प्रवासावरही काही निर्बंध असावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना नुकतेच एका बैठकीतसांगितले.मार्गदर्शक तत्त्वांत फरकक्वारंटाईनसंदर्भात केरळ राज्य सरकार व केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत फरक आहे. त्यामुळे त्याबाबत केरळ सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.मजुरांमध्ये संसर्गमध्य-पूर्वेतील देशांत बांधकाम मजुरांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तिथे अशा किती लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मध्य-पूर्व देशांमध्ये कोरोनामुळे २० केरळी लोक आतापर्यंत मरण पावल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत