शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

coronavirus: स्थलांतरीत मजुरांसोबत ग्रामीण भागात पोहोचला कोरोना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये बिघडले गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 11:24 IST

कोरोना विषाणूची भीती आणि लॉकडाऊनमुळे बंद झालेली रोजीरोटी यामुळे लाखो मजूर गावांकडे धाव घेत आहेत. मात्र हे मजूर गावी जाताना आपल्यासोबत कोरोनाचा संसर्गही घेऊन जात आहेत की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

ठळक मुद्देबेरोजगारी आणि उपासमारीमुळे मजूर मिळेल त्या साधनाने गावाकडे जात आहेत१ मेपासून श्रमिक ट्रेन सुरू झाल्याने स्थलांतर वाढल्याने कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही दिसू लागला आहे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेल्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे

लखनौ/पाटणा/रांची - देशासमोरील गंभीर आव्हान बनलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र कोरोना विषाणूची भीती आणि लॉकडाऊनमुळे बंद झालेली रोजीरोटी यामुळे लाखो मजूर गावांकडे धाव घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांच्या ये जा करण्यावर निर्बंध घातले जावेत, अशी सूचन करण्यात आली होती. मात्र बेरोजगारी आणि उपासमारीमुळे मजूर मिळेल त्या साधनाने गावाकडे जात आहेत. काही तर हजारो किलोमीटर पायपीट करून गाव गाठत आहेत. मात्र हे मजूर गावी जाताना आपल्यासोबत कोरोनाचा संसर्गही घेऊन जात आहेत की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने मजूर कामगार वर्गामध्ये अस्वस्थता आहे. त्यातच १ मेपासून श्रमिक ट्रेन सुरू झाल्याने स्थलांतर वाढल्याने कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही दिसू लागला आहे. यापूर्वी जिथे कोरोनाचे रुग्ण आढळत नव्हते, अशा ठिकाणीही कोरोनाचा फैलाव होत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेल्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. या राज्यांतील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हून कमी होती. तिथे आता दुपटीहून अधिक कोरोनाग्रस्त झाले आहेत.

 उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्याचा समावेश काही दिवसांपूर्वीपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. मात्र स्थलांतरीत मजूर आल्यानंतर येथील कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढली आहे. येथे कोरोनाचे ९५ नवे रुग्ण आढळले असून, त्यातील ४९ रुग्ण हे स्थलांतरित मजूर आहेत. जिल्ह्यात आला कोरोनाचे १२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  खगडिया जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे १५ रुग्ण सापडले. हे सर्व रुग्ण प्रवासी मजूर आहेत. जिल्ह्यात सध्या ७० कोरोनाग्रस्त रुग्ण असून, पैकी ४१ स्थलांतरीत मजूर आहेत. तर झारखंडमधील गढवा जिल्ह्यात कोरोनाचे १८ नवे रुग्ण सापडले आहेत. या जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७ झाली आहे. यातही स्थलांतरीत मजुरांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

संबंधित बातम्या 

बेरोजगारीचा कहर, लाखांमध्ये पगार घेणाऱ्यांवर मनरेगा मजूर म्हणून काम करण्याची वेळ

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

कोरोनाच्या लसीबाबत अमेरिकेच्या लीक झालेल्या लष्करी कागदपत्रातून धक्कादायक खुलासा

रशियाने रोबोच्या मदतीने उडवले लढाऊ विमान, अमेरिकेसह इतर देशांवर केली कुरघोडी...

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांपैकी ७० रुग्ण हे स्थलांतरीत असल्याचे उत्तर प्रदेशच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तर बिहारमध्ये १० मेपर्यंत कोरोनाचे ७०७ रुग्ण होते. मात्र आता येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा १६०० वर पोहोचला आहे. तर झारखंडमध्ये बुधवारी कोरोनाचे ३३ रुग्ण सापडले. यापैकी सर्व रुग्ण हे स्थलांतरीत मजूर आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारJharkhandझारखंड