शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

CoronaVirus News: कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं काय होणार?; रघुराम राजन यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 10:40 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates कोरोनानंतरच्या आर्थिक आव्हानांवर रघुराम राजन यांचं भाष्य

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आधीच मंदीसदृश्य स्थितीतून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेसमोर लॉकडाऊनमुळे आणखी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला. लॉकडाऊनमुळे गरिबांसमोरील समस्या वाढल्या असून त्यांच्यासाठी सरकारला ६५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असं राजन म्हणाले.कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. त्यावर रघुराम राजन यांनी भाष्य केलं. कोरोनानंतर भारत जागतिक पातळीवर एक मोठी भूमिका बजावू शकतो. कोरोनाचं संकट संपल्यानंतर जगात मोठे बदल होतील. त्यामध्ये भारत आपलं वेगळं स्थान निर्माण करू शकतो. त्यासाठी आपण आपले प्राधान्यक्रम निश्चित करायला हवेत. आरोग्याच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात, असं राजन यांनी सांगितलं. संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. संपूर्ण जगासाठी ही मोठी आपत्ती आहे. मात्र संकटातही संधी असू शकते. कोरोनानंतर काही देशांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. उद्योग, पुरवठा साखळीत भारताला बराच वाव आहे. मात्र त्याआधी लॉकडाऊन संपवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. लॉकडाऊन संपवायचा असल्यास आपल्याला दररोज २० लाख चाचण्या घ्याव्या लागतील. अमेरिकेपेक्षा चौपट चाचण्या करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, याकडे राजन यांनी लक्ष वेधलं.आपल्याकडे आयुष्य उत्तमपणे जगण्याची शैली आहे. आरोग्य, शिक्षणावर अनेक राज्यांनी चांगलं काम केलं आहे. मात्र मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गासमोरील आव्हानं मोठी आहेत. कोरोनाच्या संकटानंतर या वर्गाकडे चांगल्या नोकऱ्या नसतील. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. केवळ सरकारी नोकऱ्या पर्याय असू शकत नाही, अशा शब्दांमध्ये राजन यांनी कोरोनानंतरची आव्हान सांगितली.रेड, ऑरेंज झोनसाठी आता 'हिमाचल मॉडेल'; मोदींच्या सर्व राज्यांना सूचनाभाजपाचे सगळे प्रयत्न त्याचसाठी सुरू आहेत; जयंत पाटील यांचा गंभीर आरोपनरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaghuram Rajanरघुराम राजन