शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

CoronaVirus News: दारुमुळे घशातून व्हायरस नष्ट होईल, राज्यात दारुविक्री सुरु करा, आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 08:03 IST

देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे, पुढील दोन दिवसात लॉकडाऊनचा हा कालावधी संपत आहे. मात्र, लॉकडाऊन आणखी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे

कोटा - राजस्थानमधील काँग्रेस आमदाराने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून राज्यातील दारुची दुकाने सुरु करण्याची मागणी केली आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती आणि दारुपासून मिळणाऱ्या कराची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. विशेष म्हणजे, सरकारने खुलेपणाने दारुविक्रीला परवानगी नाकारली आहे. मात्र, अवैधपणे दारुविक्री जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे काही जणांचा हा लॉकडाऊन काळात स्वयंरोजगार झाल्याचे राजस्थानच्या कोटा येथील सांगोद मतदारसंघाचे आमदार भरतसिंह कुंदनकपूर यांनी म्हटलंय. यासोबत, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीकडेही त्यांनी लक्ष वेधलंय.    

देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे, पुढील दोन दिवसात लॉकडाऊनचा हा कालावधी संपत आहे. मात्र, लॉकडाऊन आणखी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, देशातील विविध राज्यात राजकीय पक्षातील नेते आणि काही नामवंत व्यक्तींकडून दारु सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रात दारुची दुकाने आणि हॉटेल्स सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. ''राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे,'' अशी सूचना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. राज ठाकरेंच्या या सूचनांवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अवैध दारुविक्री सुरु असल्याचे मान्य केले होते. 

राज्याला पैशांची गरज आहे हे 100 टक्के आहे. त्यात काहीच शंका नाही. या परिस्थितीमध्ये महसूल कसा उभा करायचा याचा विचार करावा लागेल. दारू बंद केल्यानं दारू बंद आहे असं नाही. कारण काळाबाजार सुरु झालेला दिसतो, थोरातांनी सांगितलं होतं. 

आता, राजस्थानमधील आमदार भरतसिंह कुन्दनपूर यांनी सविस्तरपणे पत्र लिहून राज्यात दारु सुरु करण्याची मागणी केली. अवैध आणि घावटी दारु विक्रीचं प्रमाण वाढलं असून ते पिणाऱ्यांना शारिरीक त्रास होत आहे. ३० एप्रिल रोजीच्या एका बातमीचा संदर्भ देत, घावटी दारु पिल्याने दोघांना अंधत्व आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, अवैध दारुविक्री सुरु असून राज्यात महसूल तुट भरुन काढण्यासाठी दारुची दुकाने सुरु करावी असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, जर कोरोना व्हायरस हातावर दारु टाकल्यानंतर निघून जातो, तर पिणाऱ्यांच्या घशातून तो व्हायरस साफ होईल, तो व्हायरल नष्ट होईल, असे धक्कादायक विधान या आमदारांनी केले आहे. घावटी दारु पिऊन जीव गमावण्यापेक्षा हे कधीही चांगलं, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. 

टॅग्स :liquor banदारूबंदीcorona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानMLAआमदारAshok Gahlotअशोक गहलोत