शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Coronavirus: सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करु; ‘या’ मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 13:04 IST

सोशल डिस्टेंसिंगचं तंतोतंत पालन करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देकोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी बंगळुरुमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेतबंगळुरुमधील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने सरकार चिंतेत लोकांनी सोशल डिस्टेंसिगचं पालन कराव, मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन

बंगळुरु – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांत लॉकडाऊन लागू करण्यात आला. जगभरातील ८० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली तर ३ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाखांच्या वर पोहचला आहे.

कर्नाटकात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येवर भाजपा सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यातील जनतेनं सोशल डिस्टेंसिंगच पालन करावं, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागेल. त्यात सर्वकाही बंद करण्यात येईल. बंगळुरुमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील काही भाग सील करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच आज मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढील उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी बंगळुरुमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. व्यवस्था करुन ठेवली आहे पण बंगळुरुमध्ये वाढणारे रुग्ण चिंताजनक आहेत. त्यामुळे लोकांना आवाहन आहे की, सोशल डिस्टेंसिंगचं तंतोतंत पालन करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, घातक कोरोना विषाणूने आता कर्नाटकाच्या राजकीय आस्थापनात देखील प्रवेश केला आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या आत मंत्र्यांची पत्नी आणि कन्येला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने सुधाकर आणि त्यांच्या दोन मुलांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

त्याचसोबत येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या २५ हजारपर्यंत पोहोचेल असा अंदाज राज्याच्या कोव्हीड वॉर रूमचे इन्चार्ज मुनिष मोदगील यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा सध्याचा ३ टक्के दर पाहता प्रक्षेपित दर ४ टक्के इतका पकडून मोदगील यांनी हा अंदाज वर्तविला आहे. विषाणू किती वेगाने पसरतोय यावर प्रक्षेपित दर ठरत असल्यामुळे बाजी त्यांचा निश्चित आकडा सांगता येणे शक्य नाही. तथापि या संदर्भात पुढील ५० ते ६० दिवस निर्णय ठरणार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेने मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे पालन, सतत हात धुणे या गोष्टींच्या बाबतीत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे, असे मनीष मोदगील यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाBengaluruबेंगळूर