शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा, गावाकडे निघालेल्या 13 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 11:24 IST

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 900 वर पोहोचली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 900 वर पोहोचली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बंद असल्याने अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब समोर असतानाच भारतात लॉकडाऊन दरम्यान 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊन दरम्यान झालेल्या वेगवेगळ्या अपघात 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू जवळपास 200 किलोमीटर अंतर पायी चालल्यानंतर झाल्याची माहिती समोर येत आहे. अशा एकूण 13 जणांचा देशात मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा तेलंगणातील शमशाबादमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. मिनी ट्रकमधून जवळपास 30 मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत होते. यावेळी ट्रकचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला.

 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व लोक चालत आपल्या घराकडे निघालेले असताना रस्त्यातून जाणाऱ्या एका ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. तर जवळपास 200 किलोमीटर अंतर पायी चालल्यानंतर अचानक एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीहून मध्य प्रदेशाच्या मुरैनाकडे निघालेल्या एका व्यक्तीने चालता-चालता जीव गमावला आहे. रणवीर असं या व्यक्तीचं नाव असून पायी चालत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज अजून काही रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबधितांची संख्या 193 वर पोहोचली आहे. पुणे 5, मुंबई 4 तर जळगाव, नागपूर आणि सांगलीमध्ये कोरोनाचे प्रत्येकी एक नवे रुग्ण आढळले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या

Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

Coronavirus: चिंताजनक! भारतात एका दिवसात कोरोनाचे १९४ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

Coronavirus: कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; जगातील पहिलीच ह्दयद्रावक घटना

जगातले सगळ्यात महाभयंकर व्हायरस, कोरोनाच्या आधी यांनी घातलेलं थैमान

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAccidentअपघातDeathमृत्यूNarendra Modiनरेंद्र मोदी