शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
2
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
3
लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर
4
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
5
आजचा अग्रलेख: संशयकल्लोळ..!
6
गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
7
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

Coronavirus, Lockdown News: ईशान्य भारतात आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध हटविले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 4:02 AM

नागरिकांना मोठा दिलासा : विशेष पासची आवश्यकता नाही

गुवाहाटी : गुवाहाटी : ईशान्य भारतातील आंतरराज्य प्रवासावर लॉकडाऊनच्या काळात घातलेले निर्बंध रविवारपासून हटविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात अशा प्रवासासाठी आता विशेष पास काढण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या साथीपासून ईशान्यभारतातील सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर ही राज्ये झाली आहेत, अशी घोषणा ईशान्य भारत विकास खात्याचे राज्यमंत्रीजितेंद्र सिंह यांनी २७ एप्रिल रोजी केली होती.

आसाममध्ये या विषाणूचे ४२ रुग्ण आढळून आले होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंतबिश्व सरमा यांनी सांगितले की, ईशान्य भारतातील इतर राज्यांतून आसाममध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांची ‘कोविड-१९’ लक्षणविषयक चाचणी करण्यात येईल. आसामने सिक्कीम वगळता इतर राज्यांना लागून असलेल्या आपल्या सीमा आंतरराज्यीय प्रवासासाठी रविवारपासून खुल्या केल्या आहेत. मात्र ज्यांना इतर राज्यांतून आपल्या खासगी वाहनाने आसाममध्ये यायचे असेल त्यांनी आपल्या प्रवासाचा दिवस व वेळ याचा तपशील आसाम सरकारला आधी कळविला पाहिजे.विमानांद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

लॉकडाऊनच्या काळामध्ये ईशान्य भारतातील राज्यांतील जनतेचे हाल होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने विशेष दक्षता घेतली आहे. या राज्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विशेष विमानांद्वारे करण्यात येत आहे. ३० मार्चपासून एअर इंडिया, भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानांनी ही मालवाहतूक करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील सर्व राज्ये, जम्मू-काश्मीर, लडाख, अंदमान-निकोबार बेटे अशा ठिकाणी विशेष विमानांतून जीवनावश्यकवस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या