शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

LockdownNews: राहुल गांधींनी घेतली स्थलांतरित मजुरांची भेट, रस्त्यावर बसूनच साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 20:30 IST

या मजुरांपैकी एक, देवेंद्र म्हणाले, राहुल गांधी अर्ध्या तासांपूर्वी अम्हाला भेटले. आम्ही हरियाणातून चालत आलो आहोत. त्यांनी आम्हाला गाडी उपल्बध करून दिली. ते म्हणाले, ही गाडी आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडेल. यावेळी त्यांनी आम्हाला भोजन, पाणी आणि मास्कदेखील दिले.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी घेतली स्थलांतरित मजुरांची भेट.राहुल गांधींनी मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली.तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी मजुरांना कर्ज देणारे पॅकेज नको, खिशात पैसा द्या, असा सल्लाही दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे शहरी भागांत राहणारे स्थलांतरित मजूर अेनेक संकटांचा आणि समस्यांचा सामना करत आपापल्या गावी परतत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुखदेव विहार उड्डानपुलावरून आपापल्या राज्यांत जाण्यासाठी निघालेल्या अशाच काही मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, या मजुरांच्या समस्या समजून घेतल्या. 

या मजुरांपैकी एक, देवेंद्र म्हणाले, राहुल गांधी अर्ध्या तासांपूर्वी अम्हाला भेटले. आम्ही हरियाणातून चालत आलो आहोत. त्यांनी आम्हाला गाडी उपल्बध करून दिली. ते म्हणाले, ही गाडी आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडेल. यावेळी त्यांनी आम्हाला भोजन, पाणी आणि मास्कदेखील दिले.

आणखी वाचा - आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

राहुल गांधी मोदी सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. लॉकडाउन काळातही त्यांनी सरकारच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहे. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरून तर ते प्रामुख्याने सरकार निशाणा साधत आहेत. 

आणखी वाचा - धक्कादायक! कोरोना बरे झाल्यानंतरही सोडत नाही पिच्छा; चीनमधील डॉक्टरांनी दिला 'गंभीर' इशारा

मजुरांना कर्ज देणारं पॅकेज नको, खिशात पैसा द्या,तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्ला चढवत, लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारे पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवेत. लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका -शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका. ते रेटिंग नंतरही सुधारू शकेल. सध्या देशात मजूर आणि शेतकऱ्यांचा विषय काळजीचा आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

आणखी वाचा - आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीdelhiदिल्लीLabourकामगार