शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Coronavirus : 'देशाला स्मार्ट उपायांची गरज', राहुल गांधींचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 08:57 IST

Coronavirus : भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही 9352 हून अधिक झाली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही 9352 हून अधिक झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींना सल्ला दिला आहे.

देशाला स्मार्ट उपायांची गरज असल्याचा सल्ला राहुल गांधी यांनी  नरेंद्र मोदींना दिला आहे. तसेच पंतप्रधानांनी देशातल्या गरीब लोकांसाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. लॉकडाऊन हे गरिबांसाठी मोठं संकट ठरलं आहे. शेतकरी आपला माल विकू शकत नाही. मजुरांचे हाल होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर देशाला स्मार्ट उपायांची गरज असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

शेतीपासून बाजारापर्यंत माल पोहोचवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी राहुल गांधी यांनी आवाज उठवला होता. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली होती. लॉकडाऊन सुरक्षितरीत्या काढणं शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. रब्बी हंगामातील पिकं शेतात उभी राहिलेली असून, लॉकडाऊनपायी कापणीचे काम कठीण झाले आहे. यामुळे शेकडो शेतकर्‍यांची उपजीविका धोक्यात आली असल्याचं  त्यांनी म्हटलं होतं.

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशवासियांना संदेश दिला आहे. सोनिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत लोकांना शांतता आणि संयम बाळगण्याची विनंती केली आहे. तसेच कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य सेवकांचे आभार मानले आहेत. याचबरोबर काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता देशवासियांची मदत करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. ''माझ्या प्रिय देशवासियांने, तुम्हा सर्वांना नमस्कार! कोरोनाच्या या संकटात तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरक्षित असाल अशी आशा करते. सर्वात आधी या संकटात शांतता, धीर आणि संयम बाळगल्याने जनतेचे आभार मानते. तुम्ही लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहात अशी आशा करते. घरामध्ये रहा, वेळोवेळी हात धुवा. खूपच गरज असेल तरच घराबाहेर पडा. यावेळी मास्क, ओढणी लावून या लढाईमध्ये सहकार्य करावे, असं सोनियांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : चिंताजनक! दिल्लीत एका दिवसात कोरोनाचे ३५६ नवे रुग्ण, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३५२ वर

जनतेला सवलती मिळण्याच्या शक्यता, आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष

खासगी कोरोना चाचण्या आता फक्त गरिबांसाठीच, न्यायालयाचा नवा आदेश

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतDeathमृत्यूcongressकाँग्रेस