शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

CoronaVirus Live Updates : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'फोन पे चर्चा'; CoWIN अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 13:20 IST

CoronaVirus Live Updates Uddhav Thackeray And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली असून आढावा घेतल्याची माहिती मिळत आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसची (CoronaVirus) दुसरी लाट लसीकरण आणि बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन लावूनही थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन दिवसांपासून सलग नव्या रुग्णांचा आकडा हा चार लाखांच्या पार येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांचा आकडाही कमालीचा वाढू लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,01,078 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,38,270 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली असून आढावा घेतल्याची माहिती मिळत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहिलं आहे. कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination) राज्यासाठी वेगळे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्या. कोविन अ‍ॅपवर सातत्याने समस्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अ‍ॅप्लिकेशन तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,18,92,676 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लसीकरण का महत्वाचे? 

कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्यानं लसींच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी लसीकरण किती महत्वाचं आहे हे सांगणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होणारे रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून त्यांना वाचवता येतं, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. देशातील एकूण 1 लाख कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. यातून समोर आलेली अंतिम माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

कोरोना रुग्णांना सेवा देताना डॉक्टर्स सर्वात मोठ्या धोक्याचा सामना करत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो. कोरोना लसीमुळे डॉक्टरांना एक बुस्टर मिळाला आहे. लस घेऊनही कोरोना होत असला तरी त्याचं इन्फेक्शनचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. अगदी सात दिवसांतही रुग्ण बरा होतो. विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण होत नाही. त्यामुळे लसीबाबतच्या सर्व भ्रामक गोष्टींना बाजूला ठेवून नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं, अशी माहिती प्राध्यापक आर.के.धिमान यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र