शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

CoronaVirus Live Updates : भीषण वास्तव! ना ऑक्सिजन, ना उपचार; हतबल बापाने बाईकवरून घरी आणला लेकीचा मृतदेह; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 15:24 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्या वडिलांना तिला बाईकवरून सरकारी ट्रामा सेंटरमध्ये नेले. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑक्सिजन आणि उपचार न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. शेवटी हतबल झालेल्या बापाने बाईकवरून लेकीचा मृतदेह घरी आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजाबादमधील एका मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्या वडिलांना तिला बाईकवरून सरकारी ट्रामा सेंटरमध्ये नेले. 

सरकारी ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने तिला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. वेळेत योग्य उपचार आणि ऑक्सिजन न मिळाल्याने मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. मात्र त्यानंतर तिला घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका देखील मिळाली नाही. शिवनारायण यांच्या मुलीची प्रकृती ही अचानक बिघडली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. रुग्णवाहिका बोलवण्यासाठी त्यांनी अनेकदा फोन केला. मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. 

मुलीची प्रकृती आणखी बिघडत असल्याने वडिलांनी तिला बाईकवरून नेले आणि तातडीने रुग्णालय गाठले. मात्र तिथे ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने वडिलांच्या डोळ्यादेखतचं मुलीचा जीव गेला आहे. वडिलांनी आपला मुलीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते मुलीला वाचवू शकले नाहीत. नियमांनुसार, मृतदेह हा वाहनातून घरी पाठवण्यात येतो. मात्र अशी कोणतीच सोय ही सरकारी ट्रामा सेंटरमध्ये नव्हती. शेवटी हतबल झालेल्या बापाला आपल्या लेकीचा मृतदेह हा बाईकवरूनच आणावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयावह! मृत्यूनंतर तब्बल 21 तास घरातच पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह; मग झालं असं काही...

मृत्यूनंतरही अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे हाल होत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मृत्यूनंतर तब्बल 21 तास कोरोनाग्रस्ताचा मृतदेह घरातच पडून असल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये घटना घडली आहे. 58 वर्षीय किशनलाल सोनी यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जवळपास 21 तास त्यांचा मृतदेह हा घरातच पडून होता. किशनलाल यांना एक मुलगा आहे मात्र त्यांची मानसिक प्रकृती ठीक नाही. कोरोनमुळे किशनलाल यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी गावातील कोणीच तयार झालं नाही. काही लोकांनी स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली. मात्र प्रशासनाच्या वतीने देखील कोणीच पुढे आले नाही. शेवटी शेजारच्याच काही लोकांनी यासाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतOxygen Cylinderऑक्सिजनDeathमृत्यू