शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! मेरठमधील रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू; अनेकांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 17:54 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मेरठमधील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केएमसी असं या रुग्णालयाचं नाव असून गेल्या 24 तासांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आठ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये जे रुग्ण आपल्या सोबत ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णालयाने सकाळीच आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची नोटीस लावली होती. 

"ऑक्सिजन उपलब्धतेसाठी रुग्णालय प्रशासन हे पूर्णत: जिल्हा प्रशासना आणि मेरठवर अवलंबून आहे. आम्हला जसा ऑक्सिजन उपलब्ध होत आहे तसा तो आम्ही रुग्णांना देत आहोत. मात्र सध्या परिस्थिती कठीण आहे याची माहिती आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना देत आहोत" असं रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

परिस्थिती गंभीर! दिल्लीच्या गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 20 जणांचा मृत्यू; अनेक रुग्णांचा जीव धोक्यात

दिल्लीच्या जयपूर गोल्ड रुग्णालयामध्ये ऑक्सिजन अभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील बत्रा आणि सर गंगाराम रुग्णालयामध्येही काही वेळ पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. जयपूर गोल्डन रुग्णालयाचे एमडी डॉ. डी के बलूजा यांनी दावा केला आहे की, काल रात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर असलेल्या 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये आणखी एक रुग्णालय सरोजमध्येही ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळेच नव्या रुग्णांना भरती करत नसल्याचं तसंच आहे. बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनचा एक टँकर पोहचवण्यात आला आहे. डॉक्टर गुप्ता यांनी रुग्णालयाला 500 किलो ऑक्सिजन ट्रकने पोहचवण्यात आला. मात्र तो फक्त एक तासापुरताच उपलब्ध आहे. रुग्णालयात 260 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूOxygen Cylinderऑक्सिजनIndiaभारत