शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 14,313 नवे रुग्ण, 224 दिवसांतील नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 10:33 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 224 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

नवी दिल्ली -  वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 224 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 14,313 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (12 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,39,85,920 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,14,900 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 4,50,963 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर

देशात 3,33,20,057 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 95,89,78,049 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. कोरोनावर जगभरात संशोधन सुरू आहे. संशोधनातून आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी होत असल्याचं आता समोर आलं आहे. अशा रुग्णांमध्ये कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता देखील सामान्य रुग्णांपेक्षा 43 टक्के कमी आहे. लॅन्सेट ई क्लिनिकल मेडिसिन या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे.

18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6,195 रुग्णांवर संशोधन

अमेरिकेतील मिनीसोटा विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बेसेल विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला, अमेरिकेतील 12 रुग्णालये आणि 60 क्लिनिकमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6,195 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले. सर्व रुग्ण 4 मार्च ते 27 ऑगस्ट 2020 दरम्यान कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. संशोधकांनी रक्ताच्या गुठळ्या नसलेले पण उपचार घेत असलेले रुग्ण आणि कोरोना मृत्यूची शक्यता यांच्यातील नेमक्या संबंधांचा अभ्यास केला. यामध्ये जे रुग्ण कोरोना ग्रस्त होण्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेत होते त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 43 टक्के कमी होती असं आढळून आलं आहे. संशोधकांनी कोरोना आधी किंवा त्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेतलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी दिसून आल्याचं म्हटलं.

आणखी वाचा 

रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी; रिसर्चमधून मोठा खुलासा

अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि भेटवस्तू, तेल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी मोठ्या रांगा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस