शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 14,313 नवे रुग्ण, 224 दिवसांतील नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 10:33 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 224 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

नवी दिल्ली -  वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 224 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 14,313 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (12 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,39,85,920 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,14,900 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 4,50,963 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर

देशात 3,33,20,057 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 95,89,78,049 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. कोरोनावर जगभरात संशोधन सुरू आहे. संशोधनातून आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी होत असल्याचं आता समोर आलं आहे. अशा रुग्णांमध्ये कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता देखील सामान्य रुग्णांपेक्षा 43 टक्के कमी आहे. लॅन्सेट ई क्लिनिकल मेडिसिन या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे.

18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6,195 रुग्णांवर संशोधन

अमेरिकेतील मिनीसोटा विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बेसेल विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला, अमेरिकेतील 12 रुग्णालये आणि 60 क्लिनिकमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6,195 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले. सर्व रुग्ण 4 मार्च ते 27 ऑगस्ट 2020 दरम्यान कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. संशोधकांनी रक्ताच्या गुठळ्या नसलेले पण उपचार घेत असलेले रुग्ण आणि कोरोना मृत्यूची शक्यता यांच्यातील नेमक्या संबंधांचा अभ्यास केला. यामध्ये जे रुग्ण कोरोना ग्रस्त होण्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेत होते त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 43 टक्के कमी होती असं आढळून आलं आहे. संशोधकांनी कोरोना आधी किंवा त्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेतलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी दिसून आल्याचं म्हटलं.

आणखी वाचा 

रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी; रिसर्चमधून मोठा खुलासा

अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि भेटवस्तू, तेल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी मोठ्या रांगा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस