शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी, 'या' सरकारची नवी हेल्पलाईन सेवा लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 10:19 IST

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्नधान्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंसाठी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागून नये यासाठी कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 600 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 19,000 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्नधान्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंसाठी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागून नये यासाठी कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनमध्ये जास्तीतजास्त लोकांनी घरी राहावे आणि किराणा सामानाच्या खरेदीसाठी गर्दी करू नये या उद्देशाने कर्नाटक सरकारने एक नवी हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. या हेल्पलाईन सेवेच्या माध्यमातून नागरिकांनी फोनवरून यादी पाठवल्यास किराणा सामान घरी आणून दिलं जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी (21 एप्रिल) हेल्पलाईन सेवेचे उद्घाटन केले आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर किराणा मालाची यादी पाठवल्यास सामान घरपोच दिले जाईल. कर्नाटक सरकारने यासाठी 080-61914960 हा क्रमांक जारी केला आहे.

'हेल्पलाईन सेवेमुळे कमीत कमी लोक घराबाहेर पडतील अशी आम्हाला आशा आहे. लोकांनी घरीच थांबावे असे आम्ही त्यांना आवाहन करतो' असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारने सेवा पुरवण्यासाठी जवळजवळ पाच हजार डिलेव्हरी एजंटशी करार केला असून या माध्यमातून लोकांना घरीच सामान पोहचवले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. बृहत बंगळूरू महानगर पालिकेचा (बीबीपीएम) हा उपक्रम होता. बंगळुरु दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या सेवेसंदर्भातील माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच यामुळे आपल्या मतदारसंघातील लोकांना फायदा झाल्याचेही सूर्या यांनी सांगितले. कशाप्रकारे घर बसल्या सामान मागवता येईल याबद्दलही बीबीपीएमने माहिती दिली आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 25 लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 19 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 984 वर पोहचली आहे. तर 640 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 19,984 वर, 640 जणांचा मृत्यू

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

CoronaVirus: जगाचा आकडा २५ लाखांवर; राज्यात एकूण ५,२१८ रुग्ण

CoronaVirus: निर्बंध उठवण्याची घाई ठरेल घातक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकYeddyurappaयेडियुरप्पाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपIndiaभारतDeathमृत्यू