शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

coronavirus: पुरी येथे होणार जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन, सर्वोच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:55 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिस्टंसिंग तसेच लॉकडाऊनच्या नियमांमुळे पुरी येथील जगन्नाथाच्या रथयात्रेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यंदाच्या वर्षी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिस्टंसिंग तसेच लॉकडाऊनच्या नियमांमुळे देशातील मोठ्या देवस्थानांपैकी एक असलेल्या जगन्नाथपुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. दरम्यान, अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने पुरी येथील जगन्नाथाची रथयात्रा आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. 

शेकडो शतकांची परंपरा असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेसाठी ओदिशामधील जगन्नाथ पुरी येथे लाखो भक्तजन देशविदेशातून येत असतात. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगन्नाथ यात्रेवर अनिश्चिततेचे सावट दाटले होते. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयानेही सुरुवातीला या यात्रेला परवानगी नाकारली होती. मात्र अखेरीस आज काही अटीशर्तींसह सर्वोच्च न्यायालयाने यात्रा आयोजित करण्यात परवानगी दिल्याने आता उद्या भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा पार पडेल.  

जगन्नाथ रथयात्रेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा केंद्र सरकारने आपली भूमिका मांडताना यात्रेस परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. अखेरीस सर्व पक्षांचे म्हणणे विचारात घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी जगन्नाथ यात्रेस परवानगी दिली. मात्र जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन मंदिर समिती, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आरोग्याच्या मुद्याशी कुठलीही तडजोड न करता करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायलायने दिले.  दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी दिलेल्या आदेशात नागरिकांच्या आरोग्यहितासाठी यावर्षी जगन्नाथ रथयात्रेला परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले होते.

नऊ दिवसांचा हा रथयात्रा महोत्सव २३ जूनपासून सुरू होईल. श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समिती आणि सेवेकऱ्यांनी राज्य सरकारला विनंती केली की, त्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या आदेशात बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका करावी. १७३६ पासून ही रथ यात्रा कोणताही अडथळा न येता सुरू राहिली होती. १५५८ आणि १७३५ यादरम्यान मुघलांच्या स्वाऱ्यांमुळे ३२ वेळा रथयात्रा झाली नव्हती, असे जगन्नाथ संस्कृतीचे संशोधक भास्कर मिश्र यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राOdishaओदिशाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय