शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशातील दैनंदिन रुग्णवाढ पुन्हा लाखाच्या आत, पण मृतांच्या संख्येने केले सर्व रेकॉर्ड ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 10:15 IST

Coronavirus in India: गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली - मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. (Coronavirus in India) गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (India reports 94,052 new Covid-19 cases, 1,51,367 discharges & 6148 deaths  in last 24 hrs)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे ९४ हजार ०५२ नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र काल दिवसभरात देशात तब्बल सहा हजार १४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. एका दिवसात झालेली सहा हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद ही कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यापासूनची एका दिवसातील सर्वांधिक मृत्यूंची नोंद आहे.  गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबळींची दैनंदिन संख्या सातत्याने घटत होती. गेले काही दिवस तर हा आकडा तीन हजारांच्याही खाली आला होता. मात्र काल एका दिवसांत झालेल्या सहा हजारांहून अधिक कोरोनाबळींच्या नोंदीमुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, गेल्या २४ तासांतील ९४ हजार ०५२ रुग्णांच्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात झालेल्या ६ हजार १४८ मृत्यूंमुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींचा आकडा ३ लाख ५९ हजार ६७६ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, काल १ लाख ५१ हजार ३६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ एवढी झाली आहे. 

देशात सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील लसीकरणाचा वेगही वाढत असून, आतापर्यंत २३ कोटी ९० लाख ५८ हजार ३६० जणांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. 

दरम्यान, एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूंची नोंद होण्यामागे बिहारमध्ये आरोग्य विभागाने कोरोनाबळींच्या संख्येत आधीच्या मृत्यूंची भर घालून केलेली वाढ हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये कोरोनाबळींच्या आकडेवारीत करण्यात आलेल्या सुधारणेमुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ४५८ वरून थेट ९ हजार ४२९ वर पोहोचली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत