शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Coronavirus: देशातील दैनंदिन रुग्णवाढ पुन्हा लाखाच्या आत, पण मृतांच्या संख्येने केले सर्व रेकॉर्ड ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 10:15 IST

Coronavirus in India: गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली - मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. (Coronavirus in India) गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (India reports 94,052 new Covid-19 cases, 1,51,367 discharges & 6148 deaths  in last 24 hrs)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे ९४ हजार ०५२ नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र काल दिवसभरात देशात तब्बल सहा हजार १४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. एका दिवसात झालेली सहा हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद ही कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यापासूनची एका दिवसातील सर्वांधिक मृत्यूंची नोंद आहे.  गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबळींची दैनंदिन संख्या सातत्याने घटत होती. गेले काही दिवस तर हा आकडा तीन हजारांच्याही खाली आला होता. मात्र काल एका दिवसांत झालेल्या सहा हजारांहून अधिक कोरोनाबळींच्या नोंदीमुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, गेल्या २४ तासांतील ९४ हजार ०५२ रुग्णांच्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात झालेल्या ६ हजार १४८ मृत्यूंमुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींचा आकडा ३ लाख ५९ हजार ६७६ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, काल १ लाख ५१ हजार ३६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ एवढी झाली आहे. 

देशात सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील लसीकरणाचा वेगही वाढत असून, आतापर्यंत २३ कोटी ९० लाख ५८ हजार ३६० जणांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. 

दरम्यान, एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूंची नोंद होण्यामागे बिहारमध्ये आरोग्य विभागाने कोरोनाबळींच्या संख्येत आधीच्या मृत्यूंची भर घालून केलेली वाढ हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये कोरोनाबळींच्या आकडेवारीत करण्यात आलेल्या सुधारणेमुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ४५८ वरून थेट ९ हजार ४२९ वर पोहोचली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत