शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in India : देशात किती लोकांना कोरोनाची लागण अन् किती जणांचा मृत्यू? आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 16:58 IST

Coronavirus in India : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 9,216 नवीन रुग्ण आढळल्याने, कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची एकूण संख्या 3,46,15,757 वर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची (Coronavirus) 3.46 कोटी प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर या महामारीमुळे 4.6 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यूदर 1.36 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी शुक्रवारी लोकसभेत  (Lok Sabha) ही माहिती दिली. यासोबतच, भारतात 10 लाख लोकसंख्येमागे 25,000 कोरोना प्रकरणे आणि 340 मृत्यूची नोंद झाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्र्यांनी कोरोना व्हायसरशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारचे कौतुकही केले. मोदी सरकारच्या काळात कमकुवत आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम सुरू आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मागील सरकारांना दोष न देता सरकारने परिणामांसाठी काम केले. गेल्या 2 वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील निर्णयावरून हे दिसून येते की, हे सरकार शक्तीने नव्हे तर इच्छाशक्तीने काम करते, असे मनसुख मांडविया म्हणाले.

गेल्या 24 तासांत 9,216 नवीन रुग्णदरम्यान, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 9,216 नवीन रुग्ण आढळल्याने, कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची एकूण संख्या 3,46,15,757 वर पोहोचली आहे. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 99,976 वर पोहोचली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अपडेट आकडेवारीनुसार, संसर्गामुळे केरळमध्ये 320 लोकांसह आणखी 391 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4,70,115 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 98.35 टक्केमंत्रालयाने सांगितले की, देशात सलग 159 व्या दिवशी दररोज 50,000 पेक्षा कमी संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून 99,976 झाली, जी एकूण प्रकरणांच्या 0.29 टक्के आहे. हा दर मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावर बरे होण्याचा दर 98.35 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 213 ने वाढली आहे.

देशात मृत्यूदर 1.36 टक्केआरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज संसर्ग होण्याचे प्रमाण 0.80 टक्के आहे. गेल्या 60 दिवसांपासून हा दोन टक्क्यांहून कमी राहिला आहे. साप्ताहिक संसर्ग दर 0.84 टक्के आहे, जो गेल्या 19 दिवसांपासून एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 3,40,45,666 झाली आहे, तर मृत्यूदर 1.36 टक्के आहे. देशात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कोरोना लसीचे 125.75 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlok sabhaलोकसभाIndiaभारतHealthआरोग्य