शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

Coronavirus in India : देशात किती लोकांना कोरोनाची लागण अन् किती जणांचा मृत्यू? आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 16:58 IST

Coronavirus in India : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 9,216 नवीन रुग्ण आढळल्याने, कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची एकूण संख्या 3,46,15,757 वर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची (Coronavirus) 3.46 कोटी प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर या महामारीमुळे 4.6 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यूदर 1.36 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी शुक्रवारी लोकसभेत  (Lok Sabha) ही माहिती दिली. यासोबतच, भारतात 10 लाख लोकसंख्येमागे 25,000 कोरोना प्रकरणे आणि 340 मृत्यूची नोंद झाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्र्यांनी कोरोना व्हायसरशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारचे कौतुकही केले. मोदी सरकारच्या काळात कमकुवत आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम सुरू आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मागील सरकारांना दोष न देता सरकारने परिणामांसाठी काम केले. गेल्या 2 वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील निर्णयावरून हे दिसून येते की, हे सरकार शक्तीने नव्हे तर इच्छाशक्तीने काम करते, असे मनसुख मांडविया म्हणाले.

गेल्या 24 तासांत 9,216 नवीन रुग्णदरम्यान, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 9,216 नवीन रुग्ण आढळल्याने, कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची एकूण संख्या 3,46,15,757 वर पोहोचली आहे. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 99,976 वर पोहोचली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अपडेट आकडेवारीनुसार, संसर्गामुळे केरळमध्ये 320 लोकांसह आणखी 391 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4,70,115 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 98.35 टक्केमंत्रालयाने सांगितले की, देशात सलग 159 व्या दिवशी दररोज 50,000 पेक्षा कमी संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून 99,976 झाली, जी एकूण प्रकरणांच्या 0.29 टक्के आहे. हा दर मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावर बरे होण्याचा दर 98.35 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 213 ने वाढली आहे.

देशात मृत्यूदर 1.36 टक्केआरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज संसर्ग होण्याचे प्रमाण 0.80 टक्के आहे. गेल्या 60 दिवसांपासून हा दोन टक्क्यांहून कमी राहिला आहे. साप्ताहिक संसर्ग दर 0.84 टक्के आहे, जो गेल्या 19 दिवसांपासून एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 3,40,45,666 झाली आहे, तर मृत्यूदर 1.36 टक्के आहे. देशात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कोरोना लसीचे 125.75 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlok sabhaलोकसभाIndiaभारतHealthआरोग्य