शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

CoronaVirus News: "...अन्यथा देशात कोरोनामुळे आतापर्यंत ६८ हजार जणांचा मृत्यू झाला असता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 18:48 IST

आतापर्यंत देशात कोरोनाचे १ लाख २० हजाराच्या आसपास रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा साडे तीन हजारांहून अधिक आहे.

नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या एक लाख वीस हजारांच्या आसपास पोहोचली असून मृतांचा आकडा साडे तीन हजारांच्या मागे गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात जवळपास दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्याचं कोरोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील एका गटानं म्हटलं आहे. लॉकडाऊन योग्य वेळी जाहीर केला नसता, तर सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा नेमका किती असता, याची माहिती या गटानं दिली आहे.कोरोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील गटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनमुळे संक्रमणाचा वेग घटल्याचं मत व्यक्त केलं. 'लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रसारचा वेग घटला. लॉकडाऊन नसता, तर कोरोना रुग्णांचा संख्या खूप जास्त असती. लॉकडाऊनमुळे रुग्णांसोबतच मृतांचा आकडादेखील घटला. अन्यथा आजच्या घडीला देशात ३७ ते ६८ हजार जणांचा मृत्यू झाला असता. तर बाधितांची संख्या १४ ते २९ लाख असती,' असं पॉल म्हणाले. देशातले ८० टक्के कोरोना रुग्ण केवळ पाच राज्यांमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली आणि मध्य प्रदेशचा समावेश होतो. देशातले ९० टक्क्यांहून अधिक कोरोना बाधित १० राज्यांमध्ये असून उर्वरित राज्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं पॉल यांनी सांगितलं. मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, ठाणे पुणे, इंदूर, कोलकाता, हैदराबाद आणि औरंगाबाद या १० शहरांमध्ये कोरोनाचे ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण असल्याची माहिती पॉल यांनी दिली.पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या