शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Coronavirus: “घरी जा अन्यथा, मेला तर गॅरेंटी नाही”; हॉस्पिटल न सोडणाऱ्या रुग्णांना मंत्र्यांचा धक्कादायक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 11:39 AM

इतकचं नाही तर मंत्र्यांनी डॉक्टरांना सांगितले की, रुग्णांना सेवा देणं बंद करा. गोपाल भार्गव यांचा डॉक्टरांसोबत संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देर्व जिल्ह्यातील रुग्ण इथे आहेत. कोणालाही अडवू शकत नाही कारण हे सरकारी रुग्णालय आहे.शुक्रवारी २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं. त्यातील फक्त १ रुग्ण घरी गेलाजर बरे झालेले रुग्ण हॉस्पिटलमध्येच राहत असतील तर गंभीर रुग्णांना कुठे ठेवायचं?

एकीकडे देशभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यात राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधानांची मालिकाही सुरूच आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा हॉस्पिटलमध्ये जनकल्याण मंत्री गोपाल भार्गव पोहचले. तेव्हा डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसंबंधित समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावर मंत्रीमहोदयांनी अजब उपाय सांगितले.

नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्ण घरी जाऊ इच्छित नाहीत. रुग्ण जास्त असल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यानंतर मंत्री गोपाल भार्गव यांनी काही अजब उपाययोजना सांगितल्या. रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेला तर आमची जबाबदारी नाही असं मंत्री म्हणाले.

इतकचं नाही तर मंत्र्यांनी डॉक्टरांना सांगितले की, रुग्णांना सेवा देणं बंद करा. गोपाल भार्गव यांचा डॉक्टरांसोबत संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावेळी स्थानिक नेतेही तिथे उपस्थित होते. या समस्येवर संबंधित डॉक्टरांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यातील रुग्ण इथे आहेत. कोणालाही अडवू शकत नाही कारण हे सरकारी रुग्णालय आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले ते घरी जात नाहीत. ज्यांची ऑक्सिजन पातळी ९६-९८ आहे तेदेखील इथेच राहत आहेत. शुक्रवारी २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं. त्यातील फक्त १ रुग्ण घरी गेला. जर बरे झालेले रुग्ण हॉस्पिटलमध्येच राहत असतील तर गंभीर रुग्णांना कुठे ठेवायचं? घरात ऑक्सिजन पातळी कमी होईल या भीतीनं रुग्ण घरी जायला तयार नाहीत असं डॉक्टरांनी सांगितले.

कोरोनासारख्या महामारीनं लोकांच्या मनात दहशत आहे. अशात नेत्यांच्या अशा विधानामुळे रुग्णांची मानसिकता अजूनही खालावत आहे. मध्य प्रदेशात २ दिवसांपूर्वी एक प्रकरण समोर आलं होतं. जिथे शिवपूर जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. रुग्णाला लावलेला ऑक्सिजन सपोर्ट यूनिट स्टाफनं काढल्याचं सीसीटीव्ही कैद झालं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या