शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

coronavirus: 24 तासात आढळले 227 कोरोनाग्रस्त, देशातील रुग्णांची संख्या 1251

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 18:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, स्थलांतरीत आणि विदेशातून देशात आलेल्या अनेक नागरिकांनी आपली ओळख लपवल्याने प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. लोकांना घऱातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. देशात सोमवारच्या आकडेवारीनुसार कोविड-१९ चे १०७१ रुग्ण असून, २९ जणांचा मृत्यू झाला होता. रविवारपासून देशात ९२ नवे रुग्ण समोर आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. त्यानंतर, मंगळवारी यामध्ये आणख वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या २४ तासांत देशातील २२७ कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकरणे समोर आली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, स्थलांतरीत आणि विदेशातून देशात आलेल्या अनेक नागरिकांनी आपली ओळख लपवल्याने प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळेच, अचानपणे विविध राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. देशात आत्तापर्यंत म्हणजेच मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२५१ वर पोहोचली आहे. त्यामध्ये गेल्या २४ तासात तब्बल २२७ रुग्ण आढळले आहेत. देशातील १२५१ रुग्णांपैकी १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एक रुग्ण स्थलांतरील आहे. सध्या १११७ रुग्णांवर उपचार सुरू असून ते वैद्यकीय तपासणीखाली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, लॉकडाऊनच्या गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.   

दरम्यान, कोरोना व्हायसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात एकूण १२५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४९ विदेशी नागरिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत या जीवघेण्या व्हायरसमुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत देशातील केरळ राज्य आघाडीवर असून केरळमध्ये २०२ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर, महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून राज्यात १९८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यत ८ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यूHealthआरोग्य