शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
3
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
4
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
5
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
6
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
7
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
8
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
9
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
10
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
11
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
12
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
13
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
14
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
15
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
16
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
17
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
18
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
19
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
20
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: 24 तासात आढळले 227 कोरोनाग्रस्त, देशातील रुग्णांची संख्या 1251

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 18:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, स्थलांतरीत आणि विदेशातून देशात आलेल्या अनेक नागरिकांनी आपली ओळख लपवल्याने प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. लोकांना घऱातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. देशात सोमवारच्या आकडेवारीनुसार कोविड-१९ चे १०७१ रुग्ण असून, २९ जणांचा मृत्यू झाला होता. रविवारपासून देशात ९२ नवे रुग्ण समोर आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. त्यानंतर, मंगळवारी यामध्ये आणख वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या २४ तासांत देशातील २२७ कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकरणे समोर आली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, स्थलांतरीत आणि विदेशातून देशात आलेल्या अनेक नागरिकांनी आपली ओळख लपवल्याने प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळेच, अचानपणे विविध राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. देशात आत्तापर्यंत म्हणजेच मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२५१ वर पोहोचली आहे. त्यामध्ये गेल्या २४ तासात तब्बल २२७ रुग्ण आढळले आहेत. देशातील १२५१ रुग्णांपैकी १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एक रुग्ण स्थलांतरील आहे. सध्या १११७ रुग्णांवर उपचार सुरू असून ते वैद्यकीय तपासणीखाली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, लॉकडाऊनच्या गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.   

दरम्यान, कोरोना व्हायसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात एकूण १२५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४९ विदेशी नागरिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत या जीवघेण्या व्हायरसमुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत देशातील केरळ राज्य आघाडीवर असून केरळमध्ये २०२ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर, महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून राज्यात १९८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यत ८ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यूHealthआरोग्य