शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

CoronaVirus: RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार; ECI चा नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 5:38 PM

CoronaVirus: आता पुन्हा निवडणूक आयोगाने नवा आदेश काढला आहे.

ठळक मुद्देECI चा नवा नियम RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक२ मे रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालासंदर्भात कडक नियमावली

नवी दिल्ली: देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. यातच देशातील पाच विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. याची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. देशातील कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी निवडणुका जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले. यानंतर निवडणूक आयोगाने हालचाल करत मतमोजणीच्या संदर्भात नवी नियमावली जाहीर केली. यानंतर आता पुन्हा निवडणूक आयोगाने नवा आदेश काढला आहे. (election commission mandatory for candidates and their agents to show negative rt pcr test reports)

मद्रास उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत अनेक नवीन नियम आणि आदेश काढले आहेत. २ मे रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालासंदर्भात निवडणूक आयोगाने आणखी एक नवा आदेश काढला आहे. आता मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा रिपोर्ट सादर करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. 

१३५ शिक्षकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? हायकोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरे

पाच विधानसभा, पोटनिवडणुकांची मतमोजणी

रविवार, २ मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी या पाच राज्यांमध्ये मतमोजणी आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तसेच काही पोटनिवडणुकांचा निकालही घोषित करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्र पूर्णपणे सॅनिटाइझ करणे, तसेच मतमोजणी केंद्रावर गर्दी करण्यास बंदी घातली आहे.

गौतम गंभीर यांना औषधे वाटपाचं लायसन्स दिले आहे का; दिल्ली हायकोर्टाचा सवाल

एक अधिकारी पीपीई कीट घातलेला

मतमोजणी अधिकाऱ्यांची बैठकव्यवस्था अशी असावी की, दोन अधिकाऱ्यांच्या मधे एक अधिकारी पीपीई कीट घातलेला असेल. त्याचबरोबर जिंकणाऱ्या उमेदवारास दोनपेक्षा जास्त व्यक्तींना सोबत आणायला परवानगी नाही, असे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. यापूर्वीही निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. 

दिल्लीत केंद्राचा नवा कायदा लागू; आता नायब राज्यपाल हेच ‘सरकार’

दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे. येत्या २ मे रोजी ५ राज्यांसाठी होणाऱ्या मतमोजणीसाठी काय तयारी केली, त्याचा प्लान सादर करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत, २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Puducherry Assembly Elections 2021पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१High Courtउच्च न्यायालय