शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

coronavirus: कोरोनाची व्याप्ती समजण्यासाठी घरोघरी जाऊन चाचण्या, ६८ जिल्ह्यांमध्ये २४ हजार व्यक्तींची तपासणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 05:32 IST

विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी हे मारकद्रव्य सधारणपणे १० ते १४ दिवसांनी रक्तात तयार होत असते. हे मारकद्रव्य रक्तात आढळले तर त्या व्यक्तीला विषाणूसंसर्ग झाला आहे, असा निष्कर्ष काढता येतो. अशा चाचण्यांना ‘सेरो सर्व्हे’ असे म्हटले जाते.

नवी दिल्ली : सध्या आढळून आलेल्या कोरोनाबाधितांखेरीज देशातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोकांना या रोगाचा संसर्ग झालेला असू शकेल याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) घरोघरी जाऊन ‘रॅण्डम’ चाचण्या घेण्याची नवी मोहीम सुरू केली आहे.यात ६९ जिल्ह्यांमधील २४ हजार प्रौढ व्यक्तींच्या चाचण्या घेण्यात येतील. यामुळे या विषाणूच्या संसर्गाच्या संभाव्य व्याप्तीचा अंदाज करता येऊ शकेल.‘आयसीएमआर’चे एक संशोधक डॉ. तरुण भटनागर यांनी सांगितले की, या चाचणीमध्ये संबंधित व्यक्तीच्या रक्तात ‘इम्युनोग्लोब्युलिन जी’ (आयजीजी) हे घातक विषाणू नष्ट करणारे मारकद्रव्य (अ‍ॅन्टिबॉडी) तयार झाले आहे की नाही, हे तपासले जाईल.विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी हे मारकद्रव्य सधारणपणे १० ते १४ दिवसांनी रक्तात तयार होत असते. हे मारकद्रव्य रक्तात आढळले तर त्या व्यक्तीला विषाणूसंसर्ग झाला आहे, असा निष्कर्ष काढता येतो. अशा चाचण्यांना ‘सेरो सर्व्हे’ असे म्हटले जाते.या चाचण्यांसाठी कोरोनाचे किती रुग्ण आढळले आहेत या निकषावर संसर्गाचे प्रमाण निरनिराळे असलेले ६९ जिल्हे निवडण्यात आले आहेत. अशा जिल्ह्यांमधील प्रत्येकी १० ‘क्लस्टर’मध्ये प्रत्येकी ४०० कुटुंबांची सरधोपटपणे (रॅण्डम) निवड करून त्या कुटुंबातील प्रत्येकी एकता प्रौढ व्यक्तीची चाचणी केलीजाईल.याखेरीज कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या इस्पितळे व आरोग्य केंद्रांमध्ये वेगळ्या चाचण्या घेण्याची एक स्वतंत्र मोहीमही सध्या सुरू आहे. या चाचण्या देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहेत.या चाचण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील सहा सरकारी व चार खासगी इस्पितळांची निवड केली जाते. यात अशा प्रत्येक इस्पितळात १०० आरोग्यसेवक, फ्ल्यूची लक्षणे नसलेले ५० ‘ओपीडी’ कर्मचारी व ५० गर्भवती महिलांच्या ‘आरटी-पीसीआर’व ‘अ‍ॅन्टिबॉडी’ चाचण्या घेतल्या जातात.या दोन्ही प्रकारच्या चाचण्या समाजात तीव्र प्रकारच्या श्वसनरोगांच्या रुग्णांचे (एसएआरआय) प्रमाण किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी केल्या जातात.‘आयसीएसआर’ने याआधी १८ एप्रिल रोजी अशाच एका ‘एसएआरआय’ चाचणी सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले होते. त्या चाचण्या १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या काळात २० राज्यांच्या ५२ जिल्ह्यांमध्ये ५,९११ रुग्णांवर केल्या गेल्या होत्या. त्यात १०४ रुग्णांना (१.८ टक्के) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत