शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Coronavirus: कोरोनाचा धोका कायम, केंद्राने ३१ ऑगस्टपर्यंत लागू केले असे नियम, या पाच सूत्री रणनीतीवर असेल भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 12:46 IST

Coronavirus in India: देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - देशातील बहुतांश भागात आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Coronavirus in India) त्याच पार्श्वभूमीवर केंद्राने कोरोनाच्या महामारीसंबंधीच्या नियमांना ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Coronavirus threat persists, rules enforced by Center till August 31, emphasis on these five-point strategy)

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचा प्रभावी पद्धतीने सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, लस आणि कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन या पाच सूत्री रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी येणाऱ्या सणांच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोरोनापासून बचावाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

भल्ला म्हणाले की, सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आर्थिक आणि अन्य व्यवहारांना टप्प्याटप्प्याने उघडले जात आहेत. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट समाधानकारक आहे. मात्र आताही देशामध्ये सक्रिय रुग्ण हे अपेक्षेपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे सध्यातरी कोरोनाला रोखण्यासाठीच्या निर्बंधांमध्ये कुठल्याही प्रकारची शिथिलता मिळण्याची शक्यता नाही आहे. निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय हा खूप विचार करून घेतला पाहिजे.

भल्ला यांनी यावेळी १४ जुलै रोजी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेखही केला आहे. त्या त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या आर फॅक्टरमध्ये वाढ होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. आर फॅक्टरच्या माध्यमातून एक व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकते, याचा अंदाज बांधला जातो. तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिल प्रशासनाला कोरोना व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही भल्ला यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार