शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

Coronavirus: कोरोनाचा धोका कायम, केंद्राने ३१ ऑगस्टपर्यंत लागू केले असे नियम, या पाच सूत्री रणनीतीवर असेल भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 12:46 IST

Coronavirus in India: देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - देशातील बहुतांश भागात आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Coronavirus in India) त्याच पार्श्वभूमीवर केंद्राने कोरोनाच्या महामारीसंबंधीच्या नियमांना ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Coronavirus threat persists, rules enforced by Center till August 31, emphasis on these five-point strategy)

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचा प्रभावी पद्धतीने सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, लस आणि कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन या पाच सूत्री रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी येणाऱ्या सणांच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोरोनापासून बचावाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

भल्ला म्हणाले की, सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आर्थिक आणि अन्य व्यवहारांना टप्प्याटप्प्याने उघडले जात आहेत. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट समाधानकारक आहे. मात्र आताही देशामध्ये सक्रिय रुग्ण हे अपेक्षेपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे सध्यातरी कोरोनाला रोखण्यासाठीच्या निर्बंधांमध्ये कुठल्याही प्रकारची शिथिलता मिळण्याची शक्यता नाही आहे. निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय हा खूप विचार करून घेतला पाहिजे.

भल्ला यांनी यावेळी १४ जुलै रोजी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेखही केला आहे. त्या त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या आर फॅक्टरमध्ये वाढ होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. आर फॅक्टरच्या माध्यमातून एक व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकते, याचा अंदाज बांधला जातो. तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिल प्रशासनाला कोरोना व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही भल्ला यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार