शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाचा धोका कायम, केंद्राने ३१ ऑगस्टपर्यंत लागू केले असे नियम, या पाच सूत्री रणनीतीवर असेल भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 12:46 IST

Coronavirus in India: देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - देशातील बहुतांश भागात आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Coronavirus in India) त्याच पार्श्वभूमीवर केंद्राने कोरोनाच्या महामारीसंबंधीच्या नियमांना ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Coronavirus threat persists, rules enforced by Center till August 31, emphasis on these five-point strategy)

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचा प्रभावी पद्धतीने सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, लस आणि कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन या पाच सूत्री रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी येणाऱ्या सणांच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोरोनापासून बचावाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

भल्ला म्हणाले की, सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आर्थिक आणि अन्य व्यवहारांना टप्प्याटप्प्याने उघडले जात आहेत. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट समाधानकारक आहे. मात्र आताही देशामध्ये सक्रिय रुग्ण हे अपेक्षेपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे सध्यातरी कोरोनाला रोखण्यासाठीच्या निर्बंधांमध्ये कुठल्याही प्रकारची शिथिलता मिळण्याची शक्यता नाही आहे. निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय हा खूप विचार करून घेतला पाहिजे.

भल्ला यांनी यावेळी १४ जुलै रोजी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेखही केला आहे. त्या त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या आर फॅक्टरमध्ये वाढ होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. आर फॅक्टरच्या माध्यमातून एक व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकते, याचा अंदाज बांधला जातो. तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिल प्रशासनाला कोरोना व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही भल्ला यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार