शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

Coronavirus: कोरोनाचा धोका कायम, केंद्राने ३१ ऑगस्टपर्यंत लागू केले असे नियम, या पाच सूत्री रणनीतीवर असेल भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 12:46 IST

Coronavirus in India: देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - देशातील बहुतांश भागात आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र देशात अद्यापही मोठ्या प्रमाणावर सक्रिय रुग्ण असल्याने केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्याच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ढिलाईला कुठलेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Coronavirus in India) त्याच पार्श्वभूमीवर केंद्राने कोरोनाच्या महामारीसंबंधीच्या नियमांना ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Coronavirus threat persists, rules enforced by Center till August 31, emphasis on these five-point strategy)

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचा प्रभावी पद्धतीने सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, लस आणि कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन या पाच सूत्री रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी येणाऱ्या सणांच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोरोनापासून बचावाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

भल्ला म्हणाले की, सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आर्थिक आणि अन्य व्यवहारांना टप्प्याटप्प्याने उघडले जात आहेत. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट समाधानकारक आहे. मात्र आताही देशामध्ये सक्रिय रुग्ण हे अपेक्षेपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे सध्यातरी कोरोनाला रोखण्यासाठीच्या निर्बंधांमध्ये कुठल्याही प्रकारची शिथिलता मिळण्याची शक्यता नाही आहे. निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय हा खूप विचार करून घेतला पाहिजे.

भल्ला यांनी यावेळी १४ जुलै रोजी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेखही केला आहे. त्या त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या आर फॅक्टरमध्ये वाढ होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. आर फॅक्टरच्या माध्यमातून एक व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकते, याचा अंदाज बांधला जातो. तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिल प्रशासनाला कोरोना व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही भल्ला यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार