शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला, आठवडाभरासाठी दिल्लीच्या सीमा बंद, केजरीवाल यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 16:58 IST

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभरासाठी बंद राहणार आहे. मात्र पासच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक ये जा करू शकतील.

नवी दिल्ली -  गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एकीकडे देश अनलॉक होऊन अनेक निर्बंध शिथिल होत असताना दिल्लीमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुढील आठवडाभरासाठी दिल्लीच्या सीमा बंद राहणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी केजरीवाल यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभरासाठी बंद राहणार आहे. मात्र पासच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक ये जा करू शकतील. तसेच दिल्लीतील नागरिकांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही राज्याच्या सीमा उघडण्याबाबत निर्णय घेऊ, असेही केजरीवाल यांनी सांगितलेत.

केजरीवाल यांनी पुढे सांगितले की, दिल्लीमध्ये सलून उघडतील. मात्र स्पा बंद राहतील. तसेच यापूर्वी ज्या व्यवहारांना परवानगी दिली होती ती कायम राहील. तसेच रात्री कर्फ्यूच्या वेळी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सर्व लोक घरात राहतील. तसेच दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची परवानगी असेल. तसेच दुकाने उघडण्यासाठीचा ऑड इव्हनचा नियम बंद करण्यात आला असून, आता सर्व दुकाने उघडतील.

 दरम्यान, दिल्ली सरकारने पुढील एका आठवड्यापर्यंत दिल्लीच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरिदाबाद या शहरातून दिल्लीत येण्यासाठी प्रवेश मिळणार नाही. मात्र ज्यांच्याकडे पास असेल त्यांना अत्यावश्यक कामांसाठी दिल्लीत प्रवेश मिळेल.

 आता दिल्लीच्या सीमा पुढेही बंद ठेवायच्या की काय करायचे याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सल्ला देण्याचे आवाहन दिल्लीतील नागरिकांना केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल