शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला, आठवडाभरासाठी दिल्लीच्या सीमा बंद, केजरीवाल यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 16:58 IST

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभरासाठी बंद राहणार आहे. मात्र पासच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक ये जा करू शकतील.

नवी दिल्ली -  गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एकीकडे देश अनलॉक होऊन अनेक निर्बंध शिथिल होत असताना दिल्लीमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुढील आठवडाभरासाठी दिल्लीच्या सीमा बंद राहणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी केजरीवाल यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभरासाठी बंद राहणार आहे. मात्र पासच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक ये जा करू शकतील. तसेच दिल्लीतील नागरिकांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही राज्याच्या सीमा उघडण्याबाबत निर्णय घेऊ, असेही केजरीवाल यांनी सांगितलेत.

केजरीवाल यांनी पुढे सांगितले की, दिल्लीमध्ये सलून उघडतील. मात्र स्पा बंद राहतील. तसेच यापूर्वी ज्या व्यवहारांना परवानगी दिली होती ती कायम राहील. तसेच रात्री कर्फ्यूच्या वेळी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सर्व लोक घरात राहतील. तसेच दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची परवानगी असेल. तसेच दुकाने उघडण्यासाठीचा ऑड इव्हनचा नियम बंद करण्यात आला असून, आता सर्व दुकाने उघडतील.

 दरम्यान, दिल्ली सरकारने पुढील एका आठवड्यापर्यंत दिल्लीच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरिदाबाद या शहरातून दिल्लीत येण्यासाठी प्रवेश मिळणार नाही. मात्र ज्यांच्याकडे पास असेल त्यांना अत्यावश्यक कामांसाठी दिल्लीत प्रवेश मिळेल.

 आता दिल्लीच्या सीमा पुढेही बंद ठेवायच्या की काय करायचे याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सल्ला देण्याचे आवाहन दिल्लीतील नागरिकांना केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल