शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

coronavirus: कोरोनामुळे परिस्थिती बिघडली, भारतात समूह संसर्गास सुरुवात झाली, आयएमएने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 8:38 AM

गेल्या काही दिवसांत देशभरात मिळून दररोज ३० हजारांहून रुग्ण सापडू लागले आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे दहा लाखांच्या वर गेली असून, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) भारतातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती बिघडली असून, देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेकोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. हे खूप वाईट संकेत

नवी दिल्ली - दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर देशात अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाच्या फैलावाने वेग घेतला आहे. दररोज देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चिंताजनक पातळीवर वाढ होत असून, गेल्या काही दिवसांत देशभरात मिळून दररोज ३० हजारांहून रुग्ण सापडू लागले आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे दहा लाखांच्या वर गेली असून, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) भारतातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती बिघडली असून, देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे, अशी माहिती आयएमएने दिली आहे.

आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरपर्सन डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सांगितले की, देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही बाब खूप चिंताजनक आहे. देशात दररोज ३० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती खूप वाईट आहे. आता कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. हे खूप वाईट संकेत असून, देशात समूह संसर्ग झाल्याचे दिसत आहे.

एकीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशात समूह संसर्ग सुरू झाला नसल्याचा दावा सातत्याने करत असतानाच डॉ. मोंगा यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या समूह संसर्ग झाल्या नसल्याच्या  दाव्याला अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी आव्हान दिले आहे. दरम्यान, प्रचंड वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे भारत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

दरम्यान, डॉ. मोंगा म्हणाले की, कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. दिल्लीमध्ये आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार. कोरोना हा असा आजार आहे, जो खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी संपूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे, तसेच केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे.  

 अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे भारतात आहेत. शनिवारच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाचे दहा लाख ३८ हजार ७१६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामधील २६ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ लाख ५३ हजार ७५१ जणांनी कोरोनाला मात दिली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMedicalवैद्यकीयHealthआरोग्य