शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोना वाढतोय, लॉकडाऊनची शक्यता, रेल्वेसेवाही बंद होणार? रेल्वे प्रशासनाचं मोठं विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 14:07 IST

Indian Railway News : महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देप्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतीलसमर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतीलया सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. (coronavirus in India) त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी विविध ठिकाणी निर्बंध लागू करण्यात येऊ लागले आहे. महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (lockdown in India) तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आता याबाबत सूचक विधान केले आहे.  मध्य रेल्वेने या संदर्भात ट्वीट करत लांब पल्ल्याच्या नियमित आणि स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रानुसार धावत राहतील, असे सांगितले आहे.  ( Corona is on the rise, possibility of lockdown, train service will be closed? Railway administration's big statement ...)

या ट्वीटमध्ये मध्य रेल्वेच्या प्रशासनाने म्हटले आहे की, प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतील. तर रेल्वे बोर्डाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. समर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतील. या सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.  

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांनी गोंधळून जाऊ नये. प्रवाशांना आवाहन आहे की, त्यांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नये. केवळ ९० मिनिटे आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचावे. रेल्वे वेटिंग लिस्टवर नजर ठेवून आहे. आवश्यकता भासेल त्या प्रमाणे अतिरिक्त स्पेशल ट्रेन चालवण्यात येईल.  

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण लॉकडाऊन होण्याच्या भीतीने बरेच लोक गावाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकांना गडबडून न जाण्याचे आवाहन केले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे