शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

coronavirus: प्रवासी, मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीबाबत केंद्राचा मोठा निर्णय, अंमलबजावणीसाठी राज्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 19:18 IST

देशातील लॉकडाऊन संपून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासी आणि मालवाहतुकीबाबत निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला.

ठळक मुद्देएका राज्यामधून दुसऱ्या राज्यात होणारी प्रवाशांची ये जा आणि मालाची वाहतूक यांच्यावर आता कुठलीही बंधने घालण्यात येऊ नयेतशेजारील देशांशी झालेल्या करारांतर्गत सीमेपलीकडील व्यापारासाठी व्यक्ती आणि सामानाच्या वाहतुकीसाठी वेगळी परवानगीअसे निर्बंध हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींअंतर्गत गृहमंत्रालयाने केलेल्या सूचनांचे उल्लंघन ठरेल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी सध्या देशामध्ये विविध प्रतिबंध लागू करण्यात आलेले आहे. देशातील लॉकडाऊन संपून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासी आणि मालवाहतुकीबाबत निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना पत्र लिहिले आहे.देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये देण्यात येत असलेल्या सवलतीच्यादरम्यान राज्यांतर्गत आणि एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात होणारी प्रवाशांची ये जा आणि मालाची वाहतूक यांच्यावर आता कुठलीही बंधने घालण्यात येऊ नयेत, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.या पत्रात अजय भल्ला लिहितात की, विविध जिल्हे आणि राज्यांकडून स्थानित पातळीवर दळणवळणावर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. अशा बंधनांमुळे माल आणि सेवांच्या आंतरराज्यीय दळणवळणामध्ये अडथळे येत आहेत. तसेच यामुळे पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. अनलॉकच्या नियमावलीमध्ये व्यक्ती आणि मालाच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कुठलाही निर्बंध लागू करू नयेत, असे स्पष्ट केलेले आहे. तसेच शेजारील देशांशी झालेल्या करारांतर्गत सीमेपलीकडील व्यापारासाठी व्यक्ती आणि सामानाच्या वाहतुकीसाठी वेगळी परवानगी, मान्यता किंवा ई परमिटची आवश्यकता भासणार नाही.असे निर्बंध हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींअंतर्गत गृहमंत्रालयाने केलेल्या सूचनांचे उल्लंघन ठरेल. तसेच प्रवासी आणि माला्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येऊ नये, तसेच अनलॉकसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले गेले पाहिजे, असे गृहसचिवांनी या निर्देशात म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोी यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने ३१ मेपर्यंत वाढले होते. मात्र १ जूनपासून देशातील लॉकडाऊन मर्यादित करून मिशन अनलॉकची सुरुवात करण्यात आली होती.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार