शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

coronavirus: प्रवासी, मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीबाबत केंद्राचा मोठा निर्णय, अंमलबजावणीसाठी राज्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 19:18 IST

देशातील लॉकडाऊन संपून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासी आणि मालवाहतुकीबाबत निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला.

ठळक मुद्देएका राज्यामधून दुसऱ्या राज्यात होणारी प्रवाशांची ये जा आणि मालाची वाहतूक यांच्यावर आता कुठलीही बंधने घालण्यात येऊ नयेतशेजारील देशांशी झालेल्या करारांतर्गत सीमेपलीकडील व्यापारासाठी व्यक्ती आणि सामानाच्या वाहतुकीसाठी वेगळी परवानगीअसे निर्बंध हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींअंतर्गत गृहमंत्रालयाने केलेल्या सूचनांचे उल्लंघन ठरेल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी सध्या देशामध्ये विविध प्रतिबंध लागू करण्यात आलेले आहे. देशातील लॉकडाऊन संपून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासी आणि मालवाहतुकीबाबत निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना पत्र लिहिले आहे.देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये देण्यात येत असलेल्या सवलतीच्यादरम्यान राज्यांतर्गत आणि एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात होणारी प्रवाशांची ये जा आणि मालाची वाहतूक यांच्यावर आता कुठलीही बंधने घालण्यात येऊ नयेत, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.या पत्रात अजय भल्ला लिहितात की, विविध जिल्हे आणि राज्यांकडून स्थानित पातळीवर दळणवळणावर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. अशा बंधनांमुळे माल आणि सेवांच्या आंतरराज्यीय दळणवळणामध्ये अडथळे येत आहेत. तसेच यामुळे पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. अनलॉकच्या नियमावलीमध्ये व्यक्ती आणि मालाच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कुठलाही निर्बंध लागू करू नयेत, असे स्पष्ट केलेले आहे. तसेच शेजारील देशांशी झालेल्या करारांतर्गत सीमेपलीकडील व्यापारासाठी व्यक्ती आणि सामानाच्या वाहतुकीसाठी वेगळी परवानगी, मान्यता किंवा ई परमिटची आवश्यकता भासणार नाही.असे निर्बंध हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींअंतर्गत गृहमंत्रालयाने केलेल्या सूचनांचे उल्लंघन ठरेल. तसेच प्रवासी आणि माला्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येऊ नये, तसेच अनलॉकसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले गेले पाहिजे, असे गृहसचिवांनी या निर्देशात म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोी यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने ३१ मेपर्यंत वाढले होते. मात्र १ जूनपासून देशातील लॉकडाऊन मर्यादित करून मिशन अनलॉकची सुरुवात करण्यात आली होती.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार