शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

Coronavirus:…तर सध्याची परिस्थिती टाळता आली असती; नॅशनल टास्क फोर्सचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 10:35 IST

एप्रिलमध्ये भारताच्या वैद्यकीय संशोधन संस्था आयसीएमआरने यावरुन इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी आरोग्य मंत्रालयाने त्याकडे दुर्लक्ष केले.

ठळक मुद्दे२५ मे रोजी तीन नामांकित वैद्यकीय संस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहेआजारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राने अवलंबलेल्या धोरणांवर टीका लॉकडाऊनची कठोर सक्ती, धोरणांमध्ये समन्वयाचा अभाव याची किंमत मोजावी लागत आहे

नवी दिल्ली – कोरोना रोखण्यासाठी आजपासून देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. मात्र देशात आता सामुहिक संक्रमणाचा धोका वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी दावा केला आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ८० हजारांच्या वर पोहचला आहे तर ५ हजारापर्यंत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, देशात अनेक झोनमध्ये कोरोनाचं सामुहिक संक्रमण सुरु झालं आहे. त्यामुळे सध्या कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश मिळत आहे हे मानणं चुकीचे ठरेल. तसेच या टास्कफोर्सने कोरोना रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजनांवर टीकास्त्रही सोडलं आहे.

भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याचे संभाव्य पुरावे यापूर्वीही सापडले होते. एप्रिलमध्ये भारताच्या वैद्यकीय संशोधन संस्था आयसीएमआरने यावरुन इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी आरोग्य मंत्रालयाने त्याकडे दुर्लक्ष केले. एप्रिलमध्ये कोरोना महामारीवर लक्ष ठेवण्यासाठी नॅशनल टास्क फोर्सने एक समिती गठीत केली होती. २५ मे रोजी तीन नामांकित वैद्यकीय संस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे, यात कोरोना संसर्ग आजारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राने अवलंबलेल्या धोरणांवर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींना ज्यांनी पत्र लिहिले त्यांच्यात आरोग्य मंत्रालयाचे माजी सल्लागार, एम्स, बीएचयू, जेएनयूचे माजी आणि विद्यमान प्राध्यापकांचा समावेश आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणार्‍यांमध्ये डॉ. डीसीएस रेड्डी हेही आहेत. रेड्डी कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात या तज्ज्ञांनी लॉकडाऊन क्रूर असल्याचं म्हटले आहे आणि लॉकडाऊनची कठोर सक्ती, धोरणांमध्ये समन्वयाचा अभाव याची किंमत मोजावी लागत आहे.

या पत्रामध्ये असे लिहिले आहे की, कोरोना विषाणू या टप्प्यावर नियंत्रित केला जाऊ शकतो असा विचार करणे वास्तविकतेच्या पलीकडे असेल, कारण भारतातील बर्‍याच झोनमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली आहे. जर सुरुवातीच्या काळात जेव्हा संसर्ग कमी प्रमाणात होता तेव्हा मजुरांना घरी जाण्याची परवानगी मिळाली असती तर सध्याची परिस्थिती टाळता आली असती. शहरांमधून परत आलेले मजूर आता देशातील कानाकोपऱ्यात संसर्ग घेऊन जात आहेत. याचा परिणाम ग्रामीण आणि दुर्गम भागात होईल, त्याठिकाणी आरोग्य व्यवस्था इतकी परिपूर्ण नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच जर भारत सरकारने सुरुवातीला संसर्ग तज्ज्ञांचे मत घेतले असते तर परिस्थिती अधिक प्रभावीपणे नियंत्रित केली जाऊ शकली असती. दिल्लीच्या एम्स येथील कम्युनिटी मेडिसीनचे प्रमुख आणि रिसर्च ग्रुपचे सदस्य डॉ. शशिकांत यांनीही या पत्रावर सही केली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हे पत्र तीन वैद्यकीय संस्थांनी जारी केलेले संयुक्त निवेदन आहे, ते खासगी मत नाही असंही सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी