शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

Coronavirus : प्रवासी मजुरांची मुंबईत गर्दी झाल्यानंतर अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 09:33 IST

वांद्रा येथे जमलेल्या जमावाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे.

मुंबई- लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवलं. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी जवळपास ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रा येथे जमलेल्या जमावाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना थेट फोन लावला आणि वांद्र्यात जमलेल्या गर्दीबाबत चिंता अन् नाराजी व्यक्त केली. अशा घटनांमुळे कोरोना व्हायरसच्या विरोधात भारताची लढाई कमकुवत होत आहे. प्रशासनानंही अशा घटना होऊ नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील सरकारला माझं पूर्ण समर्थन असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या राज्यांमध्ये जाण्यासाठी १४ तारखेनंतर ट्रेन सुरू होत आहेत, असे कळल्याने लोकांनी वांद्रे स्टेशनला गर्दी केली. कोणीतरी तसे पिल्लू सोडल्याने हा प्रकार घडला. परप्रांतातील लोकांनी त्यांच्या राज्यात जाण्याची घाई करू नये त्यांची आम्ही सर्व व्यवस्था केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्र व राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला हातात हात घालून करीत असल्याचे ते म्हणाले. राज्यातील जनतेशी मंगळवारी संवाद साधताना त्यांनी वांद्रे  येथे घडलेल्या घटनेचा आवर्जून उल्लेख केला होता.आदित्य ठाकरेंचा यू-टर्नकेंद्राने मजुरांना गावी जाण्याची संधी दिली नाही. राज्याने त्यासाठी एक दिवसाची मुभा मागितली होती. तशी मागणी केल्याचे सांगत आज आदित्य ठाकरे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. मात्र, यावर २९ मार्चला आदित्य यांनी वेगळेच टि्वट केल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मजूर व बेघरांनी परत जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी केले आहे, त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला त्यांनी दिले आहेत. ‘स्थलांतर थांबवा, जीव वाचवा’ असे आवाहन आदित्य यांनी आधीच्या टि्वट मध्ये केले होते. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे