शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

coronavirus: दु:खाचा डोंगर कोसळलाय तरी... मुलाच्या 'तेराव्या'ला २००० मास्क वाटणार 'माऊली' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 7:51 PM

कोरोना आला अन् जणू हरवेली माणूसकी जागोजागी पाहायला मिळाली. माणसाला माणूस म्हणन वागविण्यासाठी झटताना माणूस दिसत आहे

मुंबई - राज्यभरात आज दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार गेला आहे. तर ३५ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. राज्यभरात एकीकडे दिलासादायक आकडेवारी आलेली असताना दुसरीकडे दिवसभरात २२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ वर गेली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाशी अजून काही दिवस आपला लढा चालणार आहे. या लढाईत प्रत्येकजण आपलं योगदान देतंय. 

कोरोना आला अन् जणू हरवेली माणूसकी जागोजागी पाहायला मिळाली. माणसाला माणूस म्हणन वागविण्यासाठी झटताना माणूस दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींची श्रद्धास्थान असलेली मंदिरे, मशिदी, चर्चा, गुरुद्वारे आणि इतर प्रार्थनास्थळही बंद करण्यात आली आहे. मनुष्य प्राण्याला एका महाभयंकर रोगापासून वाचविण्यासाठी माणूसच कामाला लागला आहे. बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता, पण कोरोनाच्या भितीमुळे नातेवाईकांनीही रविशंकर यांच्या घरी येणं टाळले. आप्तेष्ठ आणि सगेसोयरेही मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येईनात. त्यावेळी, रविशंकर यांच्या घराशेजारील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन रविशंकर यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे आपल्या खांद्यावर त्यांचं प्रेय स्मशानभूमीत घेऊ जाताना... राम नाम सत्य है.. असा रामनामाचा जपही या मुस्लीम बांधवांनी केला. एकीकडे माणूसकीचं हे उदाहरण असताना, दुसरीकडे आपल्या २५ वर्षीय मुलाच्या निधनाचे दु:ख विसरुन एक आई मुलाच्या तेराव्याला मास्कचे वाटप करणार आहे. 

कोरोनाच्या लढाईत प्रत्येकजण आपलं योगदान देत आहे, कुठे या संवेदनशील परिस्थितीचा फायदा घेऊन मास्कची साठेबाजी करणारे समाजकंट आहेत. तर, दुसरीकडे आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख सोबत घेऊन मास्क मोफत वाटणारी आई आहे. कुल्लू येथील एका कुटुंबीयांनी माणूसकीचा पाठ शिकवला आहे. बंजार उपमंडलच्या खुंदन गावात राहणारे हे कुटुंब कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गुमानसिंह आणि त्यांच्या पत्नी समाजसेविका हरा देवी रविवारी आपल्या मुलाचा तेरावा घालत आहेत. मात्र, या तेराव्याच्या कार्यक्रमाला जेवण किंवा इतर विधी न करता, याकामी होणारा खर्च गरजूंना आणि गावातील लोकांना २००० मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. परिस्थिती आणि सामाजिक भान ठेऊन या माता-पित्यानं हे दाखवलेलं धैर्य कौतुकास्पद आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHimachal Pradeshहिमाचल प्रदेश