शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

चिंताजनक! भारतातील तब्बल ९८ टक्के लोकसंख्या अद्यापही कोरोनाच्या धोक्याच्या छायेत, आतापर्यंत केवळ २ टक्के लोकांनाच संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 13:20 IST

Coronavirus in India: कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी आकडेवारी सादर केली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या घटल्याने भारतातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचे बोलले जात आहे. मात्र देशात कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा अद्यापही मोठा असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India) मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी आकडेवारी सादर केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत भारतातील केवळ २ टक्के लोकसंख्या कोरोनाच्या संसर्गामुळे प्रभावित झाली आहे. तर तब्बल ९८ टक्के लोकसंख्या ही अद्यापही धोक्याच्या छायेत आहे. (98% of India's population still at risk of Coronavirus, so far only 2% infected)

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती देताना सांगितले की, अन्य देशांमध्ये कोरोनामुळे बाधित झालेल्या लोकसंख्येची टक्केवारी खूप अधिक आहे. मात्र भारत हे प्रमाण कमी राखण्यात यशस्वी झाला आहे. हे कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळे शक्य झाले आहे. 

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संसर्गाचे रुग्ण सापडूनही आम्ही कोरोनाचा संसर्ग केवळ २ टक्के लोकसंख्येपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरलो आहोत. हे केवळ वैद्यकीय मदतीमुळे शक्य झाले आहे. 

मात्र काही लोकांनी सरकारकडून प्रसिद्ध करण्याच आलेल्या आकडेवारीबाबत शंका उपस्थित केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारने नॅशनल सीरो सर्व्हेच्या निष्कर्षांकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यामध्ये देशातील सुमारे २० टक्के लोकसंख्या कोरोनामुळे बाधित झाली असल्याचे सांगण्यात येत होते. इंडियन कौन्सिल ऑफ इंडिया (आयसीएमआर) कडून करण्यात आलेल्या सीरॉलॉजिकल सर्व्हेमध्ये देशातील २१.४ टक्के तरु लोकसंख्या गतवर्षी डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाबाधित झाली होती, असे सांगण्यात आले होते.  

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ६७ हजार ३३४ नवे रुग्ण सापडले आहेत. तर याच काळात ३ लाख ८९ हजार ८५१ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, दिवसभरात कोरोनामुळे ४ हजार ५२९ जणांचा मृत्यू झाल्याने भारतातील एकूण कोरोनाबळींची संख्या २ लाख ८३ हजार २४८ एवढी झाली आहे. सध्या भारतामध्ये तब्बल ३२ लाख २६ हजार ७१९ सक्रिय रुग्ण आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य