शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेसारखी धोकादायक ठरू शकते - SBI रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:31 IST

Corona Virus : तिसऱ्या या लाटेचा परिणाम सुमारे 98 दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

ठळक मुद्दे इतर मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सरासरी 108 दिवस आणि तिसरी लाट 98 दिवसांपर्यंत राहू शकते, असेही रिपोर्ट म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या धोकादायक लाटेनंतर आता तिसर्‍या लाटेबाबतही विविध चर्चा सुरू आहे. तसेच, कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI Report) दिलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, तिसरी लाट दुसर्‍या लाटेप्रमाणे प्राणघातक ठरू शकते. तिसऱ्या या लाटेचा परिणाम सुमारे 98 दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (third covid wave could be as severe as second, SBI report)

आंतरराष्ट्रीय अनुभवांचा संदर्भ देताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या Ecowrap रिपोर्टने मूल्यांकन केले आहे की, चांगल्या तयारीमुळे महामारीच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच, इतर मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सरासरी 108 दिवस आणि तिसरी लाट 98 दिवसांपर्यंत राहू शकते, असेही रिपोर्ट म्हटले आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरूस्टेट बँक ऑफ इंडियाचा हा रिपोर्ट अशा वेळी आला आहे की, देश तिसऱ्या लाटेच्या तयारीत व्यस्त आहे. कोरोना लसीकरणाची गती वाढविण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वैद्यकीय उपकरणेही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत. दुसर्‍या लाटेचा परिणाम पाहता केवळ एका महिन्यात 90.3 लाख कोरोना प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बहुतेक सर्व बाधित राज्यांमधील कोरोना परिस्थिती सुधारली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे.

'लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुप्पट तयारी'एकीकडे आता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता तज्ज्ञांकडून तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम लहान मुलांवर जाणवू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लहान मुलांचे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी दुपटीपेक्षाही अधिक तयारी करण्यात आल्याचे सांगत सरकारने आश्वासन दिले आहे. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लक्षणे नसलेल्या केसेस आहेत. तर दुसरीकडे गंभीर केसेस कमी आहेत. कोरोना विषाणूने आपले रूप बदलले तर लहान मुलांसाठी धोका वाढू शकतो, असं मत नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल यांनी व्यक्त केले. लहान मुलांच्या रक्षणासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या केल्याच जातील. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. त्यामुळे २ ते ३ टक्के मुलांनाच रुग्णालयाची गरज भासते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतSBIएसबीआयHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस